Thane : कळवा रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक अहवाल

विक्रांत चौहान

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Kalwa Hospital Patient Deaths : ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला असून, अहवालातील माहितीवर आश्चर्य व्यक्त होत आहे.

18 रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने अखेर आपला अहवाल गेल्या आठवड्यात शुक्रवारी (22 सप्टेंबर) शासनाला सादर केला आहे.

संपूर्ण राज्यभर हे प्रकरण तापले असताना या अहवालात मात्र कोणावरही ठपका ठेवण्यात आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पालिकेच्या रुग्णालयात एकाच दिवशी मृत्यूचे तांडव होऊन एकावरही दोषारोप करण्यात न आल्याने चौकशी समितीच्या चौकशीवरच आश्चर्य आता व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Women Reservation History : …अन् महिला आरक्षण विधेयक खासदाराने फाडलं, काय झाल होतं 2010 मध्ये?

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या 18 रुग्णांच्या मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नऊ जणांची चौकशी समिती नेमली होती. 15 दिवसांत चौकशी समिती आपला अहवाल सादर करेल, असे स्वतः मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. मात्र हा अहवाल सादर करण्यास चौकशी समितीला बराच विलंब लागला.

कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरण… कुणाची करण्यात आली चौकशी?

या समितीची पहिली बैठक ठाणे महापालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात झाल्यानंतर इतर सर्व बैठका या कळवा रुग्णालयात झाल्या. या प्रकरणाची चौकशी करत असताना रुग्णालयातील महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यापासून ते डॉक्टर्स, नर्स, मृतांचे नातेवाईक अशा सर्वांचे जबाब समितीने नोंदवले.

ADVERTISEMENT

दोन वेळा मुदत उलटूनही समितीने अहवाल सादर केला नव्हता. काही दिवसांपूर्वीच अहवाल सादर केला नाही तर महापालिका आयुक्तांना घेराव घालण्याचा इशारा कळवा रुग्णालयात जाऊन काँग्रेसच्या ठाण्यातील शिष्टमंडळाने दिला होता.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लांबणार! असं आहे सुनावणी वेळापत्रक

अखेर गेल्या आठवड्यात शुक्रवारी (22 सप्टेंबर) चौकशी समितीने आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. ज्यावेळी हे प्रकरण घडले त्यावेळी केवळ ठाण्यातच नव्हे तर राज्याच्याच आरोग्य व्यवस्थेवर प्रश्चचिन्ह निर्माण करण्यात आले होते. ठाण्यातीलच नव्हे तर राज्याच्या विरोधी पक्षाने या प्रकरणावरून रान उठवले होते. बराच काळ ही चौकशी सुरु असल्याने कोणावर तरी कारवाई होईल, अशी अपेक्षा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात तसे काहींच झाले नसून या अहवालात सध्या तरी कोणावर दोषारोप ठेवण्यात आलेला नाही.

चौकशी समितीच्या अहवालात काय?

अहवालात कुणावर ठपका ठेवण्यात आला नसला, तरी रुग्णालयांच्या त्रुटींबाबत मात्र या चौकशी समितीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहेत. रुग्णालयाबाबत नेमक्या काय सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत याबाबत कुणी बोलायला तयार नाही. चौकशी समितीने सुचवलेल्या सुधारणांबाबत तरी प्रशासनाकडून अंमलबजावणी होणार का ? याबाबतही साशंकता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT