Kalyan Crime : वय २२ अन् दाखल गुन्हे ८०! पोलिसांसाठी बनला मोस्ट वॉन्टेड आरोपी

मुंबई तक

At the age 22 He became the most wanted accused for the police उल्हासनगर : एका ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगाराला अटक करण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आलं आहे. अब्दुल्ला संजय इराणी ऊर्फ सय्यद (२२ वर्षे) असं त्याचं नाव असून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये त्याच्यावर तब्बल ८० गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या रेकॉर्डवरील हा आरोपी होता. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

At the age 22 He became the most wanted accused for the police

उल्हासनगर : एका ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगाराला अटक करण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आलं आहे. अब्दुल्ला संजय इराणी ऊर्फ सय्यद (२२ वर्षे) असं त्याचं नाव असून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये त्याच्यावर तब्बल ८० गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या रेकॉर्डवरील हा आरोपी होता. साखळी चोरी, मोबाईल फोन चोरी, वाहन चोरी, खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार संजय अशोक नैनवानी (वय ४६) हे १४ जानेवारीला अंबरनाथहून उल्हासनगरकडे दुचाकीने येत होते. त्याचवेळी अब्दुल्ला त्याच्या साथीदारासह संजय नैनवानी यांचा पाठलाग करु लागला अन् काही वेळातच त्यांना गुरुद्वारा कुठे आहे अशी विचारणा केली. त्यावर संजय नैनवानी यांनी अब्दुला आणि त्याच्या साथीदाराला पत्ता सांगितला. काही अंतर गेल्यानंतर अब्दुलाने जबरदस्तीने नैनवानी यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन खेचली आणि पोलिसात तक्रार नोंदवू नका म्हणून धमकी दिली.

या घटनेनंतर घाबरलेल्या नैनवानी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार देत गुन्हा दाखल केला. तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून शोध सुरू केला. तपासादरम्यान गुन्हेगार अब्दुल्ला संजय इराणी उर्फ ​​सय्यद हा परभणी शहरातील रहीम नगर येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यानंतर त्याला तिथूनच अटक करण्यात आली.

धक्कादायक बाब म्हणजे अब्दुलावर चैन, मोबाईल चोरी, वाहन चोरी, खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा असे एकूण ८० गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकसह मुंबई, ठाणे ग्रामीणमध्ये त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं, अब्दुल्ला ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध ४ गुन्ह्यांमध्ये फरार होता.

अन्य एका गुन्हेगारालाही अटक :

दरम्यान, कल्याण पोलिसांनीही ११ गुन्हे दाखल असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. सौरभ उर्फ ​​सोन्या मनोज साळूंखे असं त्याचं नाव आहे. त्याला कल्याण पोलिसांनी भिवंडी तालुक्यातील सोरगाव येथून अटक केली आहे.

१० जानेवारी रोजी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात गुन्हेगारांनी एका नागरिकाला आणि ४ महिलांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र/सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून पळ काढला होता. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

याच गुन्ह्यांचा तपास सुरू असताना साळूंखे त्याच्या साथीदारांसह कल्याण तालुक्यातील खडवली परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खडवली परिसरात सापळा रचला, मात्र गुन्हेगार हाती लागले नाहीत. त्यानंतर आणखी एका गुप्त खबरदारामार्फत आरोपी साळूंखे हा सोरगावला येणार असल्याची माहिती मिळाली, त्यानंतर १७ जानेवारी रोजी त्याठिकाणी सापळा रचून आरोपी सौरभ उर्फ ​​सोन्या मनोज साळूंखे याला अटक करण्यात आली. त्याला १८ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केले असता २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp