संसार अर्ध्यावरच मोडून गेला, 10 महिन्यातच तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला

मुंबई तक

रस्ते अपघातात दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. असाच भीषण अपघात बीड जिल्ह्यात घडला आहे. जिथे एका नवविवाहीत तरूणीने लग्नाच्या 10 महिन्यानंतरच पतीला गमावलं आहे. या घटनेनंतर कुटुंबासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

रोहित हातागळे

Beed Accident News : धुमधडाक्यात लग्न झालं आणि नवीन संसाराला सुरुवात झाली. दोघांनीही आयुष्यभर एकमेकांची साथ न सोडण्याचे वचन दिले. पण, दहा महिन्यांतच तो संसार अर्ध्यावर मोडून निघून गेला. तिने बघितलेले सुखी संसाराचे स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झाले.  ही हृदयद्रावक, मन हेलावून टाकणारी घटना घडली बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात. (Beed Ambejogai Accident News Sushant Thakur Death in an accident by motorcycle near Satephal Fata he married before 10 months ago )

रस्ते अपघातात दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. असाच भीषण अपघात बीड जिल्ह्यात घडला आहे. जिथे एका नवविवाहीत तरूणीने लग्नाच्या 10 महिन्यानंतरच पतीला गमावलं आहे. या घटनेनंतर कुटुंबासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. 

अंबाजोगाई तालुक्यातील अंबासाखर कारखाना रोडवरील सातेफळ फाट्यानजीक मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना बुधवार (27 मार्च) रोजी सायंकाळी घडली आहे. या भयानक अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सुशांत सुनील ठाकूर (वय 23) मु. पाटोदा, ता. अंबाजोगाई तर, बालाजी भुजबळ (वय 30), रा. जोडजवळा, जिल्हा लातूर, असं अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. तसंच, शिवहर भुजबळ हे जखमी झाले आहेत.