...म्हणून जीव वाचला! Air India प्लेन मिस करणाऱ्या भूमी चौहानने सगळंच सांगितलं! 'ते 10 मिनिट...'
Air India Plane Crash Latest Update : देव तारी त्याला कोण मारी..असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण एअर इंडिया विमान अपघातात वाचलेल्या एका महिला प्रवाशानं देवाचे आभार मानले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

एअर इंडिया विमान अपघातात भूमी चौहान कशी वाचली?

भूमीने देवाचे मानले आभार

भूमी चौहान माध्यमांशी बोलताना काय म्हणाली?
Air India Plane Crash Latest Update : देव तारी त्याला कोण मारी..असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण एअर इंडिया विमान अपघातात वाचलेल्या एका महिला प्रवाशानं देवाचे आभार मानले आहेत. गुजरात्या भरूचमध्ये राहणारी भूमी चौहान अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान AI-171 अपघातातून वाचली आहे. कारण भूमीला विमानतळावर पोहोचायला दहा मिनिटे उशिर झाला होता. त्यामुळे भूमीची फ्लाईट मिस झाली अन् सुदैवाने तिचा जीव वाचला. भुमीने आजतकला प्रतिक्रिया देताना म्हटलंय, ती अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानाने प्रवास करणार होती. पण ट्रॅफिक जॅममुळे ती सरदार वल्लभभाई इंटरनॅशनल एअरपोर्टवर दहा मिनिटे उशिरा पोहोचली. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी विमानतळावर तिला एन्ट्री नाकारली.
भूमी चौहान माध्यमांशी बोलताना काय म्हणाली?
भूमीने आजतकशी बोलताना म्हटलं, माझं फ्लाईटचं टायमिंग दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी होतं. त्यामुळे मला 12 वाजून 10 मिनिटांपूर्वी विमानतळावर पोहचायचं होतं. रस्त्यात खूप मोठी ट्रॅफिक होती. त्यामुळे मी 12 वाजून 20 मिनिटांनी विमानतळावर पोहोचले. मी चेक इन करू शकलो नाही आणि सुरक्षा रक्षकांनी मला परत जाण्यासाठी सांगितलं. त्यामुळे माझी फ्लाईट मिस झाली. सुरुवातीला मला वाटलं की, थोडं लवकर आलो असतो, तर फ्लाईट पकडू शकलो असतो. पण आता वाटतंय, जे झालं ते चांगलंच झालं.
हे ही वाचा >> 1206 लकी नंबर ठरला अनलकी, 12-06 ही तारीख माजी मुख्यमंत्र्यांचा ठरला अखेरचा दिवस
भूमीने अपघाताबाबत म्हटलं, मी विमानतळाहून घरी जायला निघाली होती. तेव्हा रस्त्यात मला माहित झालं की, मी ज्या विमानात बसणार होते, ते विमान क्रॅश झालं आहे. माझं शरीरावर शहारे आले होते. मी बोलू शकत नव्हती. जे काही झालं, ते ऐकल्यानंतर मी सुन्न झाली होती. मी विचार केला की, माझे काहीतरी चांगले कर्म असतील, त्यामुळेच माझी फ्लाईट मिस झाली आणि माझा जीव वाचला. पण अन्य लोकांसोबत जे घडलं, ते खूप भयावह आहे. एवढ्या लोकांचा जीव गेला. मे देवाकडे प्राथर्ना करते की, अपघाता मृत्यू पावलेल्या लोकांच्या आत्म्यास शांती मिळू दे..
हे ही वाचा >> Air India Crash: 10 बाय 10 चं घर ते जग जिंकण्याचं स्वप्न, डोंबिवलीची रोशनी जे बोलली ते करून दाखवलं पण...
लंडनला जाणारी एअर इंडिया फ्लाईट काल गुरुवारी दुपारी 1.38 वाजता अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं. काही मिनिटानंतरच विमातळाजवळ असलेल्या रहिवासी क्षेत्रात हे विमान कोसळलं. भूमी चौहान याच विमानाने लंडनला जाणार होती. ती दोन वर्षानंतर सुट्टी एन्जॉय करण्यासाठी भारतात आली होती. ती लंडनला तिच्या वडिलांसोबत राहत होती.