Hari Narke Death : ‘दोन उलट्या झाल्या अन्…’; नरकेंचा मृत्यू कसा झाला?

भागवत हिरेकर

प्राध्यापक हरी नरके यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल छगन भुजबळ यांनी शोक व्यक्त केला. त्यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना भुजबळांचा कंठ दाटून आला.

ADVERTISEMENT

Hari Narke Death News : cabinet minister chhagan bhujbal gets emotional after hari narke passed away.
Hari Narke Death News : cabinet minister chhagan bhujbal gets emotional after hari narke passed away.
social share
google news

Hari Narke Lates News : ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि प्राध्यापक हरी नरके यांचं निधन झाले. हरी नरके हे ज्येष्ठ नेते, कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे जवळचे सहकारी होते. ते महात्मा फुले समता परिषदेचे उपाध्यक्षही होते. त्यामुळे छगन भुजबळ यांना नरके यांच्या निधनाचा धक्का बसला. हरी नरकेंबद्दल बोलताना भुजबळांचा कंठ दाटून आला. यावेळी त्यांनी नरकेंचा मृत्यू कसा झाला, याबद्दल माहिती दिली.

‘एबीपी माझा’वृत्तवाहिनीला बोलताना भुजबळांनी हरी नरकेंबद्दल भावना व्यक्त केल्या. छगन भुजबळ म्हणाले, “9 ऑगस्टच्या कार्यक्रमात असताना अतिशय धक्कादायक बातमी मला कळाली. मी विचार करू शकत नाही की, हरी नरके आमच्यात नाहीत. फुले-शाहू-आंबेडकरवादी ही जनता आहे, त्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. कारण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत फार जुनी पुस्तकं शोधून काढून लिखाण… ऐतिहासिक ज्या गोष्टी घडल्या, त्या लोकांसमोर आणण्याचं काम त्यांनी केलं.”

‘त्यांच्यासारखा माणूस आम्हाला कोण भेटणार?’

भुजबळ म्हणाले की, “महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचं काम किती महत्त्वाचं होतं, या सगळ्याबाबतीत त्यांनी तारीख वारासह अनेक पुस्तकांत वादविवाद करून पटवून दिले. महात्मा फुले समता परिषदेचे ते आधारस्तंभ होते. आम्हाला काळजी पडलीये की, यांच्यासारखा मनुष्य जो अभ्यास करणारा, इतिहासात जाऊन शोधणारा… कोण भेटणार आहे?”, अशी खंत भुजबळांनी व्यक्त केली.

वाचा >> पुरोगामी चळवळीचा शिलेदार गेला! हरी नरके यांचे निधन

“नायगावचं सावित्रीबाई फुलेंचं घर, त्यांचं स्मृतिस्थळ आपण निर्माण केलं. त्यांनी पुढाकार घेतला होता. त्याप्रमाणे ते घर तयार केलं. कितीतरी पुस्तकं त्यांनी लिहिलीत. गेल्या वर्षभरापासून ते आजारी होते. त्यांना लिलावती रुग्णालयात 15-20 दिवसांसाठी दाखल केले होते. एक-दोन महिन्यांपूर्वी राजकोटच्या रुग्णालयात गेले होते. तिथे बरं वाटत असल्याचे ते म्हणाले होते”, असंही भुजबळ यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp