India Today GDB सर्व्हे: धक्कादायक! महाराष्ट्रातल्या लोकांचं वर्तन कसं आहे, डोळे उघडवणारा रिपोर्ट
India today GDB Report: इंडिया टूडेने एक अत्यंत महत्वाचं सर्वेक्षण केलं आहे. ज्यातून देशातली आणि देशात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातली एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: असं म्हणतात की, 'जर तुम्हाला काही बदलायचं असेल तर प्रथम ते मोजलं पाहिजे'. म्हणजे एखादी गोष्ट सिध्द करण्यासाठी तीचं मोजमाप होणं महत्वाचं असतं. २०३० पर्यंत ‘जीडीपी’च्या बाबतीत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था भारताची असेल अशी बरीच चर्चा सध्या सुरु आहे. त्यामुळे इंडिया टूडेने एक अत्यंत महत्वाचं सर्वेक्षण केलं आहे. ज्यातून देशातली आणि देशात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या महाराष्ट्रातली एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
देशाच्या विकासाचं मोजमाप करण्यासाठी जीडीबी म्हणजे ‘ग्रॉस डोमेस्टिक बिहेवियर’ रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. या जीडीबी रिपोर्टला देशाच्या जीडीपीशी जोडणारी एक नाळ म्हणता येईल. राज्यातल्या नागरी वर्तन, सार्वजनिक सुरक्षा, लिंगभाव आणि diversity म्हणजे विविधता/भेदभाव या ४ अॅंगल्सने 21 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाचा अभ्यास या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे. महाराष्ट्राबद्दल या रिपोर्टमध्ये जे काही सांगण्यात आलं आहे ते बघून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
नागरी वर्तन (Civic Behavior)
सर्वात आधी पाहूयात. देशातल्या 21 राज्यांमध्ये महाराष्ट्रातलं civic behavior म्हणजे नागरी वर्तन कसंय. नागरी वर्तनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो. तर 30 वेगवेगळ्या प्रश्नांच्या आधारे केल्या गेलेल्या या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्राचा 7 वा क्रमांक लागतो. तर नागरिकांची सर्वात चांगली वागणूक असणाऱ्या राज्यांमध्ये तामिळनाडूचा पहिला आणि सर्वात शेवटचा म्हणजे 22 वा क्रमांक पंजाब राज्याचा लागतो.
म्हणजे नागरिकांना चांगली वागणूक न देणाऱ्या राज्यांमध्ये पंजाब सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. आपल्या सभोवतालच्या सार्वजनिक मालमत्ता म्हणजे बस, ट्रेन यांचा आदर करण्यापासून ते संकटाच्या वेळी जसं की अपघातात, दुष्काळात मदतीचा हात पुढे करण्यापर्यंत, व्यक्ती ज्या पध्दतीने वागतात त्यातून सामाजिक विकास ठरत असतो. समाजाला एकत्र धरून ठेवण्यासाठी नागरी वर्तन अत्यंत महत्वाचं असतं. त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेऊन हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.
