Irshalwadi Landslide : “आम्ही हाताने माती उकरून लेकरं बाहेर काढली”
रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड गावावर 20 जुलै रोजी दरड कोसळली. अनेक घरे दरडीखाली दबली गेली आहेत. सध्या एनडीआरएफचे जवान मदत कार्य करत आहेत.
ADVERTISEMENT

Irshalwadi news : ‘आम्ही गाढ झोपेत होतो. अचानक मोठा आवाज आला. बघतो तर आमच्यावरही काही प्रमाणात मातीचा ढिग पडला होता. आम्ही हाताने माती बाजूला केली. आमची लेकरंही दरडीच्या ढिगाऱ्याखाली दबली गेली होती. मग आम्ही त्यांना माती उकरून बाहेर काढलं आणि खाली पळून आलो’, थरकाप उडवणारी ही आपबीती सांगितली इर्शाळवाडी दुर्घटनेतून वाचलेल्या नागरिकांनी. (Irshalgad Landslide : major landslide in irshalwadi village of raigad district, what happened in mid night?)
इर्शाळगडाच्या पायथ्याला लागून 48 कुटुंबाची एक वाडी आहे. नाव आहे इर्शाळवाडी. मिळालेल्या माहितीनुसार लहानथोरांसह 250 च्या जवळपास लोक इथे वास्तव्यास आहेत. पण, गुरुवारी (20 जुलै) इर्शाळवाडीवर काळाने झडप घातली अन् सर्व काही उद्ध्वस्त झालं. या दुर्घटनेत वाचलेल्या काहींनी नेमकं काय घडलं? याबद्दल थरकाप उडवणारा प्रसंग सांगितला.
वाचा >> इर्शाळवाडी : दरडीने गिळलं गाव, 5 जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्याखाली
या दुर्घटनेतून जीव वाचलेल्या इर्शाळवाडीतील नागरिकांनी नेमकं काय घडलं, याची आपबीती सांगितली. एका महिलेने सांगितले की, आम्ही झोपलेलो होतो. नेमकं काय घडलं हे माहितीच नाही. पण, आम्ही ढिगाऱ्याखालून स्वतःच बाहेर आलो. आम्ही आमची लेकरं ढिगाऱ्याखालून बाहेर काढली आणि खाली आलो.
इर्शाळवाडीत ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं? #RaigadLandslide #Ersalwadi #Khalapur pic.twitter.com/OY4uEKu8Wk
— Mumbai Tak (@mumbaitak) July 20, 2023