नवा वाद! “अजित पवारांच्या भाषणाला पंतप्रधान कार्यालयानेच परवानगी दिली नाही”

मुंबई तक

देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाषण करू न दिल्याच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण झालं नाही. यावरून राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान कार्यालयानेच अजित पवारांच्या भाषणाला परवानगी दिली नाही, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. “अजित […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाषण करू न दिल्याच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण झालं नाही. यावरून राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान कार्यालयानेच अजित पवारांच्या भाषणाला परवानगी दिली नाही, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

“अजित पवार हे पालकमंत्री आहेत आणि पंतप्रधानांचाच प्रोटोकॉल त्यांना लागू असतो. त्यामुळे त्यांना हजर राहणे आवश्यक असतं. केंद्र सरकारच्या प्रोटोकॉलप्रमाणे तुमच्या जिल्ह्यात पंतप्रधान येणार असतील, तर पालकमंत्र्यांना जावं लागतं. अजित पवार तिथं जाणं योग्यचं आहे. पण, तिथं बोलायला दिलं नसेल, तर मला ते अयोग्य वाटतं. प्रोटोकॉलप्रमाणे ते पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अजित पवारांचं भाषण असायला हवं होतं,” असं ते म्हणाले.

“अजित पवारांच्या कार्यालयाने (उपमुख्यमंत्री कार्यालयाने) पंतप्रधान कार्यालयाकडे विनंती भाषण करू देण्याची विनंती केली होती. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांचा अधिकार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून अजित पवारांच्या कार्यालयाला परवानगी दिली गेली नाही. हे अतिशय गंभीर आहे. मला स्वतःला वेदना देणारं आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“अजित पवार यांना पंतप्रधानांच्या सभेत बोलू न देणं हे जाणिवपूर्वक घडलं आहे असं दिसतं. गतवेळेस दादांनी (अजित पवार) पंतप्रधानांसमोर राज्यातील महत्वाच्या व्यक्तीची शिवराय व महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातील वक्तव्ये निदर्शनास आणली होती. त्याचाच राग निघालेला दिसत आहे,” असं सावंत यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp