आप्पासाहेबांच्या घराण्याला ‘धर्माधिकारी’ आडनाव नेमकं कोणी दिलेलं… ‘शांडिल्य’ आडनाव कसं बदललं?

मुंबई तक

Appasaheb Dharmadhikari: महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं मूळ आडनाव हे शांडिल्य होतं. पण त्यांना धर्माधिकारी हे आडनाव नेमकं कोणी दिलं हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

who exactly gave the surname dharmadhikari to appasaheb family how did the surname shandilya change
who exactly gave the surname dharmadhikari to appasaheb family how did the surname shandilya change
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan)पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेमुळे आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) हे नाव महाराष्ट्रभरात अचानक चर्चेत आलं. आप्पासाहेब धर्माधिकारी कोण, त्यांचं नेमकं समाजकार्य काय.. त्यांच्या चालणाऱ्या श्री समर्थ बैठकांचं (Shree Samrath Baithak) स्वरुप कसं असतं.. या सगळ्याविषयी अनेक जण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आम्ही तुम्हाला आप्पासाहेबांविषयी एक खास गोष्ट सांगणार आहोत. ती म्हणजे त्यांच्या आडनावाची. खरं तर आप्पासाहेब किंवा त्यांचे कुटुंबीय जे ‘धर्माधिकारी’ हे आडनाव लावतात ते त्यांचं मूळ आडनावच नाही. होय.. त्यांचं खरं आडनाव हे शांडिल्य होतं. पण यामागे एक कथा आहे. जी त्यांच्याकडून देखील सांगितली जाते आणि याचबाबत महाराष्ट्र भूषण सोहळ्यात स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील भाष्य केलं. तर जाणून घेऊयात आप्पासाहेबांच्या घराण्याला धर्माधिकारी हे आडनाव नेमकं दिलं तरी कोणी. (who exactly gave the surname dharmadhikari to appasaheb family how did the surname shandilya change)

आप्पासाहेबांचे वडील म्हणजेच नारायण विष्णू धर्माधिकारी यांनी श्री समर्थ बैठकांची मुहूर्तमेढ रोवली. याच निमित्ताने त्यांनी लाखो श्री सदस्य आपल्या समर्थ बैठक परामार्थशी जोडले. त्यामुळे देशातच नव्हे तर परदेशात देखील त्यांची किर्ती पोहचली. दासबोधाच्या माध्यमातून त्यांनी निरुपणाला सुरुवात केली. त्याच माध्यमातून शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन व व्यसनमुक्ती क्षेत्रात त्यांनी काम केलं. त्यांचा हाच वारसा त्यांनी आपले ज्येष्ठ पुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिला.

हे ही वाचा>> नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमध्ये चारच ट्रस्टी का.. तेही आप्पासाहेबांच्याच घरातील?

नानासाहेबांच्या मृत्यूनंतर आप्पासाहेबांनी त्यांची समर्थ बैठकीची परंपरा ही पुढे नेली. तसंच त्याला आणखी योग्य पद्धतीने पुढे नेण्यासाठी काही गोष्टींची मांडणी केली. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री आणि राज्य सरकारने नुकताच महाराष्ट्र भूषण देऊ केला.

धर्माधिकारी आडनाव कसं मिळालं?

याबाबत एक कथा अशी सांगितली जाते की, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराण्याला साधारण 400 वर्षांचा इतिहास आहे. आप्पासाहेबांच्या आधीच्या आठव्या पिढीतील त्यांचे पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य हे होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचं आडनाव हे धर्माधिकारी नव्हे तर शांडिल्य होतं. याचबाबतचा नेमका इतिहास काय आहे हे स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील कार्यक्रमात बोलताना सांगितला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp