पत्नीनं भावांना हाताशी घेत पती अन् लेकाला संपवलं, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात...

मुंबई तक

crime news : राजस्थानातील दौसा येथे एका छोट्याशा गावातील एका कौटुंबिक कलहातून वाद निर्माण झाला. या वादामुळे पत्नीने आपल्या भावाच्या मदतीने मुलाला आणि नवऱ्याला संपवले आहे.

ADVERTISEMENT

crime news a wife killed her son and husband in a village in Daisa, Rajasthan incident
crime news a wife killed her son and husband in a village in Dausa at Rajasthan incident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पत्नीनेच लेकाला आणि नवऱ्याला संपवलं

point

कारण ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का

Crime News : राजस्थानातील दौसातील खबरावजी या छोट्या गावात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. सकाळच्या वेळी गावकऱ्यांना एका घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात दोन मृतदेह आढळले. दोघांनाही निर्घृणपणे मारहाण करुन ठार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे पाहून संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना 6 जून रोजी घडली असून एकाच कुटुंबातील दोन जीव मारले गेले आहेत. मारेकऱ्यांमध्ये 70 वर्षीय पुरुष आणि त्यांचा 35 वर्षीय तरुण मुलाचा समावेश आहे.  

हेही वाचा : नग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह; डोक्यावर खोलवर जखमा, पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

नेमकं घडलं काय? 

कुटुंबातील वृद्ध व्यक्ती धीरज बैरवा आणि त्यांचा मुलगा घनश्याम बैरवा यांना बेदम मारहाण करत ठार मारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिकांनी सांगितलं की, घनश्याम आणि त्याची पत्नी निर्मला यांच्यात नेहमी वाद व्हायचा. घडलेल्या घटनेच्या रात्री घरातून ओरडण्याचा आवाज आला असता, कौटुंबिक कलह असल्याचा समज झाल्याने स्थानिकांनी याकडे दुर्लक्ष केलं. 

दरम्यान, पोलीस तपासातून समोर आलं की, वाद झाल्यानंतर निर्मलाने तिच्या दोन्ही भावांना हाताशी घेत रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गावात बोलावले. एकाचं नाव मनोज बैरवा आणि दुसऱ्याचं प्रदीप बैरवा असे आहे. त्यांनी गावात पोहोचत निर्मलाच्या सांगण्यावरुन आपला भाचा घनश्याम आणि त्याचे वडील धीरज यांना काठ्या, रॉड आणि विटांनी मारहाण केली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा : बॉयफ्रेंडनं महिलेला OYO हॉटेलमध्ये नेऊन चाकूनं केले 17 वार, कारण ऐकूण हादरून जाल

..तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही!

दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी शेतीसाठी आलेल्या महिलांनी दोघांचेही मृतदेह पाहिले असता गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेनंतर आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेहांना अग्नी देऊ नये अशी मागणी केली. परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी तातडीने कारवाई करत निर्मला, मनोज आणि प्रदीप यांना अटक केली आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp