बहिणींचा क्षुल्लक कारणावरून वाद, भांडणात चिमुकल्याचा चिरडून अंत
Crime News : विवाहित बहिणीचा तिच्याच धाकट्या बहिणीसोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, ज्यात तिचे सहा महिन्याचे पाळण्यात झोपलेले बाळ बेशुद्ध पडले. दोघींच्या वादात बाळाचा नंतर चिरडून दुर्दैवी अंत झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सख्ख्या बहिणींमध्ये वाद
दोघींच्या वादात चिमुकल्याचा मृत्यू
Crime News : उत्तर प्रदेशातील फिरोजापूरमधून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. विवाहित बहिणीचा तिच्याच धाकट्या बहिणीसोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, ज्यात तिचे सहा महिन्याचे पाळण्यात झोपलेले बाळ बेशुद्ध पडले. दोघींच्या वादात बाळाचा नंतर चिरडून दुर्दैवी अंत झाला. मोठ्या बहिणीने लहान बहिणीविरूद्ध बाळावर हल्ला केल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, या प्रकरणी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. हे प्रकरण हे पोलीस ठाणे परिसरातील नॉर्थ झील पुलिया परिसराजवळील कृष्णा नगरमध्ये घडली होती.
हे ही वाचा : अंबरनाथ : कोब्राच्या दंशाने 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, रुग्णालयात उडाला गोंधळ
सख्ख्या बहिणींमध्ये वाद
संबंधित प्रकरणात संजना ही आपल्या माहेरी आली होती. तिचा नवरा देखील आपल्या सासरच्या मंडळींसोबत राहू लागला आणि ई-रिक्षा चालवून उदरनिर्वाह करू लागला होता. बुधवारी सायंकाळी घरातील सर्वच सदस्य जत्रेत गेले होते, ते परत आले असता, संजनाचा सहा महिन्यांचा मुलगा तनवीर हा भुकेने रडू लागला होता. तेव्हा संजनाने आपली धाकटी बहीण वंदनाला बाटलीत दूध आणून मुलाला पाजायला सांगितले. वंदनाने नकार दिल्यानंतर दोघी बहिणींमध्ये मोठा वाद झाला. त्यांनी एकमेकींचे केस पकडून वाद घालू लागल्या होत्या.
दोघींच्या वादात चिमुकल्याचा मृत्यू
इतक्यातच आई नीतूने त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न देखील केला होता, मात्र दोघांमधील वाद आणखी वाढू लागला होता. वादादरम्यान दोन्ही बहिणी पलंगावर झोपलेल्या तनवीरवर जोरात आदळल्या, ज्यात तो मुलगा रडू लागला. वडील कन्हैया यांनी मुलाला तत्काळपणे जिल्हा रूग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अशातच मुलाच्या आईने आपल्या धाकट्या बहिणीने मुलाला पाळण्यावरून जमिनीवर फेकून दिल्याचा आरोप केला. नंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सकाळी आईने आपला जबाब मागे घेतल्यानंतर सांगितलं की, जर तिने बहिणीवर आरोप केला नाही,तर ती आपल्यासोबत तिला ठेवणार नाही, असं तिच्या पतीचं म्हणणं होतं. त्यामुळे मी आता माझ्या माहेरची आणि सासरची देखील नाही. या प्रकरणात माझ्या बहिणीचा कसलाही दोष नाही. आमच्या दोघींच्या वादात चिमुकला कधी सापडला आणि ज्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला हे आम्हाला कळालं नाही. वारंवार जबाब नोंदवल्या जाणाऱ्या जबाबाची पोलीस देखील कसून चौकशी करत आहेत.









