पाणी भरण्यावरुन वाद, बायकोने नवऱ्याच्या कानाचा चावून तुकडा पाडला; गुन्हा दाखल
Kanpur Crime : पाणी भरण्यावरुन झालेल्या वादानंतर पत्नीने नवऱ्याला बेदम मारहाण केलीये.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पाणी भरण्यावरुन वाद, पत्नीकडून पतीला बेदम मारहाण

संतापलेल्या पत्नीने पतीच्या कानाचा चावा घेतला
Kanpur Crime : पाणी भरण्यावरुन सुरु झालेल्या वादानंतर पत्नीने तिच्या नवऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील अनवरगंजमध्ये हा प्रकार घडलाय. पाणी भरण्यावरुन सुरु झालेल्या वादानंतर पत्नीचा राग अनावर झाला आणि तिने नवऱ्याचा कानाच्या चावा घेत अक्षरश: तुकडा पाडलाय. दरम्यान, जखमी अवस्थेत पती अमित सोनकर पोलीस ठाण्यात पोहोचलाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या दाम्पत्यामध्ये या आधी देखील बराच वाद झालाय. त्यामुळे दोघांनी घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावला होता.
घटस्फोटासाठी न्यायालयात गेलेले असतानाच पत्नी जीवावर उठली
कोणत्या पती-पत्नीमध्ये वाद होत नाही? असं बोललं जातं. मात्र, उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात या वादानंतर पत्नी पतीच्या जीवावर उठलेली पाहायला मिळाली. पत्नी तिच्या नवऱ्याचा कान दातांनी चावला आणि तुकडा पाडलाय. शिवाय नवऱ्याला तिने बेदम मारहाण देखील केली आहे. त्यानंतर नवऱ्याने पत्नीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केलाय. शिवाय, पोलिसांनी पीडित पतीला मेडिकल चेकअपसाठी रवाना केलंय.
अधिकची माहिती अशी की, कानपूरच्या अनवरगंज येथे राहाणारा पीडित अमित सोनकर याचं एका मुलीसोबत अफेअर सुरु होतं. ही मुलगी त्याच्या शेजारीच राहात होती. दोघं इतके प्रेमात पडले की, त्यांना आठ वर्षांपूर्वी त्यांना लग्न करावं लागलं. दोघांचा संसार व्यवस्थित सुरु होता. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये सातत्याने वाद होऊ लागले. त्यानंतर अमित सोनकरने घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, मंगळवारी दाम्पत्यामध्ये पाणी भरण्यावरुन वाद सुरु झालाय.