रील करण्याच्या बहाण्याने गर्लफ्रेंडचे दोन्ही हात मागे बांधले, अन् थंड डोक्याने थेट गळा चिरुन टाकला, नेमकं कारण काय?

मुंबई तक

UP Crime News : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे प्रेमसंबंध, संशय आणि ब्लॅकमेलिंगच्या वादातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीची उसाच्या शेतात गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

UP Crime News
UP Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

रील करण्याच्या बहाण्याने गर्लफ्रेंडचे दोन्ही हात मागे बांधले

point

अन् थंड डोक्याने थेट गळा चिरुन टाकला, नेमकं कारण काय?

UP Crime News : उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून प्रेम, संशय आणि ब्लॅकमेलिंगच्या जाळ्यात अडकलेल्या एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. देहात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीटी भदवल गावात 25 वर्षीय शीला नावाची तरुणी 29 मार्च रोजी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच 2 एप्रिल रोजी गावातील एका उसाच्या शेतात या तरुणीचा मृतदेह आढळून आला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक विनीत जयस्वाल यांनी तात्काळ एसओजी आणि सर्व्हिलन्स टीमसह 4 विशेष पथके तयार करून तपासाची चक्रे फिरवली, ज्यातून हत्येचे धक्कादायक वास्तव समोर आले.

 सोशल मीडियावरील मैत्रीचा रक्तरंजित अंत

पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत समोर आले की, शीलाची हत्या दुसर्‍या कोणी नसून तिच्या प्रियकराने, अरुण कुमारने केली आहे. अरुण हा बिहारमधील रोहतास जिल्ह्याचा रहिवासी असून 2022 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांची मैत्री झाली होती. दोघांनाही रिल्स बनवण्याची प्रचंड आवड होती आणि याच आवडीतून त्यांच्यात जवळीक वाढली होती. मात्र, काही काळानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि वादाला सुरुवात झाली. अरुणच्या म्हणण्यानुसार, शीला त्याच्याकडे सातत्याने पैशांची मागणी करत होती आणि त्याला ब्लॅकमेल करत होती. अरुणने आतापर्यंत तिला ऑनलाइन आणि रोख स्वरूपात सुमारे 1,50,000 रुपये दिले होते. मात्र, पैशांच्या मागणीसोबतच अरुणला शीलावर संशय येऊ लागला की ती दुसऱ्या कोणाशी तरी बोलत असून त्याला फसवत आहे, याच संशयातून त्याने हत्येचा कट रचला.

रिल्स बनवण्याच्या बहाण्याने बोलावून संपवले आयुष्य

आपल्या मार्गातील काटा दूर करण्यासाठी अरुणने 29 मार्च रोजी शीलाला भीटी भदवल गावातील एका उसाच्या शेतात भेटायला बोलावले. तिथे रिल्स बनवण्याचा बहाणा करून त्याने तिला गाफिल ठेवले आणि चालाकीने तिचे दोन्ही हात पाठीमागे बांधले. शीलाला काही समजण्यापूर्वीच अरुणने आपल्याकडील चाकूने तिचा गळा चिरला आणि तिची जागीच हत्या केली. हे क्रूर कृत्य केल्यानंतर तो पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करून तिथून फरार झाला. उसाच्या शेतात मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सर्व्हिलन्स टीमच्या मदतीने अरुणचा माग काढला. संशयाच्या एका चुकीच्या समजापोटी आणि पैशांच्या वादातून एका तरुणाने आपल्या प्रेयसीचे जीवन अशा प्रकारे संपवल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

आरोपीला अटक आणि पोलीस कारवाई

हे वाचलं का?