Mahayuti : "भाजपचा एकनाथ शिंदेंवर दबाव", शिवसेनेच्या नेत्याच्या विधानाने खळबळ

भागवत हिरेकर

Mahayuti Shiv Sena BJP : शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या लोकसभा मतदारसंघातील काही उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा दबाव असल्याच्या शिवसेना नेत्याच्या विधानाने खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेचे नेते सुरेश नवले यांनी भाजपवर टीका केली आहे.
भाजपकडून जागावाटपात आणि उमेदवारांबद्दल शिंदेंवर दबाव टाकला जात असल्याचे विधान सुरेश नवले यांनी केले.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुरेश नवले यांची भाजपवर टीका

point

लोकसभा उमेदवार बदलण्यासाठी शिंदेंवर भाजपचा दबाव

point

शिवसेनेचे नेते जागावाटपावर नाराज

Suresh Navale on Mahayuti Seats Sharing for Lok Sabha : भाजपने एकनाथ शिंदे यांना काही जागांवरचे उमेदवार बदलण्यास सांगितले आहे. या मुद्द्यावरून आता शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री सुरेश नवले यांनी भाजपबद्दल स्फोटक विधान केले आहे. भाजपकडून एकनाथ शिंदेंवर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे, असा दावा सुरेश नवले यांनी केला. नेमकं नवले काय म्हणाले? (BJP Pressuring for replace Shiv sena lok sabha candidates said Shiv Sena leader suresh navale)

सुरेश नवले माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "भारतीय जनता पार्टीला जे लोकं नकोय, ते बददले पाहिजेत, हा त्यांचा आग्रह आहे. त्यासाठी ते सर्व्हेची कारणे देताहेत. आयबीचा रिपोर्ट विरोधात आहे. आम्ही जो सर्व्हे केला आहे, तो विरोधात आहे, त्यामुळे तुम्ही तो उमेदवार बदला. हे भाजपचे राजकारण चुकीचे आहे", असे नवले म्हणाले.  

भाजपचे षडयंत्र

नवले पुढे म्हणाले की, "मुख्यमंत्री शिंदे हे सौम्य प्रकृतीचे आहे, परंतु ठाम आहेत. हा विश्वास आम्हाला आहेत. ते भाजपच्या एकूण या षडयंत्राला बळी पडणार नाहीत. पण, अशा प्रकारचे चित्र भारतीय जनता पार्टीकडून बाहेर उभं केलं जात आहे. बाहेर चर्चा होतेय. ही चर्चा युतीसाठी घातक आहे."

हेही वाचा >> भाजपला झटका! विद्यमान खासदार ठाकरेंच्या सेनेत करणार प्रवेश?  

"एकनाथ शिंदेंसोबत जे खासदार आलेत, त्यांच्या अपेक्षा आहे की, आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे. आपण उमेदवार असलो पाहिजे. शिंदेंचीही तिच अपेक्षा आहे. पण, भाजप दबाव तंत्राचा अवलंब करून संबंधित अमूक एक व्यक्ती आहे, तो उमेदवारीस पात्र नाही. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. आयबीचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत. असे म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील आणि जवळची माणसं दूर करणं भाजपला शोभत नाही", अशी टीका सुरेश नवले यांनी केली आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp