Exit Poll : 'या' 5 राज्यांनी बिघडवलं INDIA आघाडीचं गणित, भाजपची मुसंडी?

प्रशांत गोमाणे

India Today and Axis My India Exit Poll 2024 : पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रातून (Maharashtra) या पाच राज्यात धक्कादायक निकाल हाती आले आहेत. आतापर्यंत या राज्यात प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व दिसत होते. मात्र यावेळेस मोठा उलटफेर होताना दिसत आहे. त्यामुळे या राज्यांकडून इंडिया आघाडीची (India Alliance) मोठी निराशा होणार असून त्यांना मोठा पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

एक्झिट पोलच्या आकड्यानुसार देशात भाजप 400 पार करत प्रचंड बहुमत मिळवताना दिसत आहे.
india today and axis my india exit poll 2024 these 5 state india alliance big blow and bjp nda win exit poll result
social share
google news

India Today and Axis My India Exit Poll 2024 : देशातील लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) निकालाआधी एक्झिट पोलचे (Exit Poll Result) आकडे समोर आले आहेत. या एक्झिट पोलच्या आकड्यानुसार देशात भाजप 400 पार करत प्रचंड बहुमत मिळवताना दिसत आहे. तर पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रातून (Maharashtra) या पाच राज्यात धक्कादायक निकाल हाती आले आहेत. आतापर्यंत या राज्यात प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व दिसत होते. मात्र यावेळेस मोठा उलटफेर होताना दिसत आहे. त्यामुळे या राज्यांकडून इंडिया आघाडीची (India Alliance) मोठी निराशा होणार असून त्यांना मोठा पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. (india today and axis my india exit poll 2024 these 5 state india alliance big blow and bjp nda win exit poll )

देशात लोकसभेच्या 543 जागा आहेत. इंडिया टुडे आणि ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, भाजप प्रणित एनडीएला 361 ते 401 जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीला 131 ते 166 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. इतरांना 8 ते 20 जागा मिळू शकतात. तर पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्रात या पाच राज्यांतून आलेल्या एक्झिट पोल बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : Maharashtra Exit Poll : सांगली, बारामती कुणाचा 'गेम'? पहा एक्झिट पोल

आंध्र प्रदेशचा निकाल काय? 

आंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, चंद्रबाबू नायडू यांच्या टीडीपी, भाजप आणि जनसेवा पक्षाने मोठा उलटफेर केला आहे. याचा फटका सत्ताधारी वायएसआरसीपी पक्षाला बसणार आहे. आंध्र प्रदेशात एनडीएला 21 ते 23 जागा मिळू शकतात तर सत्ताधारी वायएसआरसीपीला 2 ते 4 जागा मिळू शकतात. इंडिया आघाडीला आंध्र प्रदेशात खाते देखील उघडता आले नाही आहे. 

2019 च्या निवडणुकीत वायएस जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष YSRCP ने आंध्र प्रदेशात लोकसभेच्या 22 जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी एन चंद्राबाबू नायडू यांच्या पक्ष टीडीपीला लोकसभेत 3 जागा मिळाल्या होत्या. वायएसआरसीपीला 49.9 टक्के मते मिळाली. टीडीपीला 40.2 टक्के मते मिळाली. काँग्रेस, भाजप, जनसेना पक्षाचे खाते उघडले नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp