Opinion Poll: भाजपला ओपिनियन पोलमध्ये 'या' राज्यात शून्य जागा, पण PM मोदी म्हणतात...

मुंबई तक

ADVERTISEMENT

भाजपला ओपिनियन पोलमध्ये 'या' राज्यात शून्य जागा
भाजपला ओपिनियन पोलमध्ये 'या' राज्यात शून्य जागा
social share
google news

Lok Sabha Election 2024 Opinion Poll: मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस आणि इतर पक्ष आपापल्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, वेगवेगळे मतप्रवाह सातत्याने समोर येत आहेत. दक्षिण भारतीय राज्य तामिळनाडूसाठी एबीपी सी-व्होटरचे ताजे सर्वेक्षण समोर आले आहे. या सर्वेक्षणातील तामिळनाडूची आकडेवारी अतिशय धक्कादायक आहे. सर्वेक्षणानुसार, भाजप आणि इतर पक्ष विरोधी आघाडी भारताच्या तुलनेत खूपच कमकुवत स्थितीत असल्याचे दिसते. एबीपी सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार 2024 च्या लोकसभा निवडणुकांबाबत जनतेचा मूड काय आहे जाणून घेण्यात आलं. मात्र, पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूबाबत मोठं विधान केलं आहे. (lok sabha election 2024 bjp gets zero seats in tamil nadu in opinion polls but what exactly did pm modi say)

तामिळनाडूच्या लोकांमध्ये डीएमकेबाबत प्रचंड राग आहे आणि त्याचा फायदा हा भाजपला चांगल्या दृष्टीने होत आहे.. असं मत पंतप्रधान मोदींनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

हे ही वाचा>> Opinion Poll : महायुती की मविआ, कुणाचा होणार 'गेम'? धक्कादायक पोल

तामिळनाडूतील सर्व्हे BJP साठी धक्कादायक

एबीपी-सी व्होटर ओपिनियन पोलनुसार, तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीला मोठा विजय मिळू शकतो. तामिळनाडूतील सर्व 39 जागांवर इंडिया आघाडी विजयी होताना दिसत आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार भाजप, AIADMK आणि इतरांना एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार एनडीएला 19 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे, तर विरोधी आघाडी इंडियाला 52 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तामिळनाडूबाबत पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?

दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यात भाजपच्या स्थितीबाबत पीएम मोदी म्हणाले, "जनसंघापासून ते भाजपपर्यंत आमच्या पाच पिढ्यांनी या कल्पनेसाठी तिथे काम केले आहे. आम्ही आमच्या कल्पनांसह दक्षिणेत सातत्याने काम केले आहे. जेव्हा तामिळनाडूचे लोक काँग्रेसबाबत निराश झाले होते, तेव्हा ते प्रादेशिक पक्षाकडे वळाले. पण तिथेही आता निराशा झाल्याने त्यांनी देशभरातील भाजपची कार्यशैली पाहिली. त्यामुळे तामिळनाडूतील लोकं हे केंद्र सरकार आणि इतर राज्यातील भाजप सरकार यांच्यासोबत तुलना करू लागले आहेत.' असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा>> 'ईडी एकदम..', PM मोदी ED-CBI वर नेमकं म्हणाले काय?

पीएम मोदी पुढे म्हणाले की, "जेव्हा आम्ही वाराणसीमध्ये तामिळ काशी संगमचे आयोजन केले होते, तेव्हा द्रमुकचे लोक पाणीपुरीवाले म्हणत त्यांची खिल्ली उडवत होते, परंतु जेव्हा तामिळनाडूचे लोक येथे आले तेव्हा त्यांनी काशीची भव्यता पाहिली. तिथल्या लोकांची विचारधारा बदलली. त्यानंतर लोकांचा द्रमुकवर राग निर्माण झाला. त्यानंतर तामिळनाडूची लोकं ही आता भाजपकडे वळू लागली आहेत.' असा दावा यावेळी मोदींनी केला आहे.

ADVERTISEMENT

तामिळनाडूमध्ये भाजपचे नेतृत्व करणाऱ्या अण्णामलाई यांच्याबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, "अन्नमलाई यांच्याबद्दल लोकांना असे वाटते की, जर आयपीएस केडर सोडून हा व्यक्ती द्रमुक किंवा इतर कोणत्याही पक्षात सामील झाला असता तर त्यांचं आयुष्य सेटल झालं असतं. ते कुठेही जाऊ शकत होते. पण अण्णामलाई हे भाजपमध्ये आले म्हणजेच काहीतरी चांगली बाब आहे म्हणून आले ना.. हे आमच्या पक्षाचे वैशिष्ट्य आहे की आम्ही प्रत्येक स्तरातील लोकांना संधी देतो.' असंही मोदी यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

तामिळनाडूत 2019 लोकसभा निवडणुकांचे निकाल नेमके कसे होते?

तामिळनाडूतील 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल काँग्रेससाठी दिलासा देणारे होते. संपूर्ण देशातून निराशेचा सामना केल्यानंतर, पंजाब आणि केरळसह तामिळनाडू हे एकमेव राज्य होते जिथे काँग्रेसला दिलासा देणारे निकाल पाहायला मिळाले होते. तामिळनाडूतून काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने 8 जागा लढवून तामिळनाडूतील सर्व 8 जागा जिंकल्या होत्या आणि DMK ने 24 जागा लढवून सर्व 24 जागा जिंकल्या होत्या.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT