Maha Vikas Aghadi : "वंचितला सांगावं लागेल की...", पटोलेंचा स्फोटक खुलासा, आंबेडकरांना सवाल

मुंबई तक

Nana Patole on Prakash Ambedkar, Vanchit Bahujan Aghadi : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडी, बसपाचा उल्लेख करत मत विभाजनासाठी यांचा भाजपकडून वापर होत असल्याचा आरोप केला.

ADVERTISEMENT

नाना पटोले यांनी वंचित बहुजन आघाडीबद्दल मांडली स्पष्ट भूमिका.
वंचित बहुजन आघाडी आणि भाजपची मिलीभगत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वंचित बहुजन आघाडीवर नाना पटोले यांचा गंभीर आरोप

point

प्रकाश आंबेडकर यांना नाना पटोले यांचा सवाल

point

काँग्रेस वंचितचा पाठिंबा घेणार का?

Nana Patole on Prakash Ambedkar, vanchit Bahujan Aghadi : (देव कोटक, मुंबई) प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत बिनसल्यानंतर स्वतंत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली. दुसरीकडे काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याची घोषणा केली. याच भूमिकेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. भाजपकडून मत विभाजन केले जात असून, पटोलेंनी आंबेडकरांना प्रश्न केला आहे. (Nana patole Said that BJP is use bsp and vanchit bahujan aghadi for vote dividation)

शिवसेनेचे माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजप, बसपा आणि वंचित बहुजन आघाडीबद्दल स्फोटक दावे केले. नाना पटोले नेमकं काय बोलले, वाचा...

मतविभाजनासाठी बसपा, वंचितची मदत

नाना पटोले यांनी फडणवीसांवर मतविभाजनाचा आरोप केला. ते म्हणाले, "महाराष्ट्राची वाईट परिस्थिती आहे. तुमच्याकडे गृहखातं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. तुम्ही काय करताय? याचा माणूस फोडा, त्याचा माणूस फोडो, याच्यावर ईडी लावा, त्याच्यावर सीबीआय लावा, हे सगळं बंद करा. महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करू नका."

हेही वाचा >> ठाकरे फडणवीसांना म्हणाले, 'मी सगळा खर्च करतो'; बावनकुळेंनीही केला पलटवार

"आज तर चर्चा अशी चालू आहे की, बसपाचे उमेदवार तुम्हीच उभे करता. वंचितचे उमेदवार तुम्ही उभे करता. म्हणजे या राज्यात चाललं काय आहे? तुम्ही मत विभाजनाचं जे राजकारण करत होतात. त्या राजकारण सुद्धा लोकांना आता कळालयला लागलं आहे. तुम्ही मत विभाजन करून पुन्हा आपली राजकीय पोळी कशी शेकता येईल. असं दोनदा तुम्ही केलं. आता तिसऱ्यांदा चालणार नाही. राज्यातील जनतेने मानस केलेला आहे की, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना जे तिलांजली देण्याचे काम भाजपने केलेलं आहे. लोक आता एकजूट झालेले पाहायला मिळत आहे."

हे वाचलं का?

    follow whatsapp