Maharashtra Lok Sabha : आदित्य ठाकरेंनी कल्याण किंवा ठाण्यातून निवडणूक का लढवली नाही?
Aaditya Thackeray Latest News : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना ठाण्यातून निवडणूक लढवण्याचे आव्हान देते होते, पण लोकसभेच्या निमित्ताने संंधी असूनही रिंगणात का उतरले नाही?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

आदित्य ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीबद्दल मांडलं मत

आदित्य ठाकरे कल्याण वा ठाण्यातून निवडणूक लढवण्याबद्दल काय बोलले?

एकनाथ शिंदेंना दिले होते आव्हान
Aaditya Thackeray Lok Sabha Election : एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदारांनी आणि काही खासदारांनी बंडखोरी केल्यापासून आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना निवडणूक लढवण्याचे आव्हान देत आहेत. शिंदेंनी राजीनामा द्यावा, मी त्यांच्याविरोधात ठाण्यातून निवडणूक लढतो किंवा त्यांनी वरळीतून लढावी, असे आदित्य ठाकरे म्हणतात. श्रीकांत शिंदेंनीही आदित्य ठाकरेंना कल्याणमधून लढण्याचे प्रतिआव्हान दिले होते. हाच प्रश्न जेव्हा आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला. तेव्हा ते काय म्हणाले? (Why did Aditya Thackeray not contest from Kalyan Lok Sabha or Thane Lok Sabha constituency?)
आदित्य ठाकरेंनी लोकमत वृत्तपत्राला मुलाखत दिली. ठाणे किंवा कल्याणमधून लोकसभा निवडणुकीला उभे का राहिला नाहीत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.
आदित्य ठाकरेंनी काय दिले उत्तर?
या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, "पिक्चर अभी बाकी है! लोकसभा हा एक आवडता प्लॅटफॉर्म आहेच, तुम्ही तिथे जे बोलता ते देशभर जाते. मात्र, त्याच बरोबरीने आपला महाराष्ट्र आहे. सध्याच्या स्थितीत तरी महाराष्ट्रात मी काम करणे योग्य आहे."
हेही वाचा >> अजित पवार महायुतीच्या प्रचारातून गायब, गेले कुठे?
"कारण या लोकांनी ज्या प्रकारे मागील अडीच वर्षात महाराष्ट्र मागे नेला आहे. आमचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जी काही जबाबदारी मिळेल, ती आमदार म्हणून असेल किंवा इतर काही... त्या माध्यमातून मला महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत आणि देशभर पोहोचवायचा आहे", असे आदित्य ठाकरे म्हणाले.