Ajit Pawar : बारामतीतील मतदानानंतर शरद पवारांबद्दल अजित पवारांची भाषा का बदलली?

राहुल गायकवाड

Ajit Pawar Vs Sharad Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर अजित पवार यांची शरद पवार यांच्याबद्दलची भाषा सॉफ्ट का झाली आहे?

ADVERTISEMENT

शरद पवार आणि अजित पवार.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार विरुद्ध शरद पवार लढाई

point

बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

अजित पवारांची भाषा मवाळ का झाली आहे?

Ajit Pawar Sharad Pawar : ‘पवार साहेब आमचं दैवत आहे. मी त्यांचा मलगा असतो तर मला संधी मिळाली असती.’ हे वाक्य आहे अजित पवारांचं. राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाल्यानंतर सभांमधून पवारांना टार्गेट करणाऱ्या अजितदादांची पवारांबाबतची भाषा आता सॉफ्ट झाली आहे. फुटीनंतर पवारांना आमचे वरिष्ठ म्हणून संबोधणारे अजितदादा आता शरद पवारांना पुन्हा आमचं दैवत म्हणत आहेत. बारामतीच्या निवडणुकीनंतर अजितदादांची पवारांबाबतची भाषा का बदलली, बारामतीच्या निवडणुकीनंतर नेमक्या कुठल्या गोष्टी घटल्या, हे सगळं समजावून घेऊयात पाच मुद्यांमध्ये.... 

नुकताच बारामतीची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही गटांची जोरदार भाषणं झाली. सभांना देखील मोठा प्रतिसाद मिळाला. निवडणुकीच्या दिवशी मात्र सर्व लक्ष रोहित पवार यांनी खेचून घेतलं. अजित पवार गटाकडून अनेक ठिकाणी पैसे वाटण्यात आले असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा >> 'आता दुकान बंद करण्याची वेळ झालीए..', पवारांबद्दल बोलताना फडणवीसांचं मोठं विधान 

दुसरीकडे दत्ता भरणे यांचा व्हिडीओ देखील व्हायरला झाला होता. महत्त्वाचं म्हणजे दिवसभर मतदारसंघ पिंजून काढणारे अजित पवार निवडणुकीच्या दिवशी मात्र मतदान केल्यानंतर घरीच बसून होते. अजित पवार संध्याकाळी थेट सभेला निघून गेले.
 
मतदानाचा दिवस पार पडल्यानंतर अजित पवारांची भाषा काहीशी बदललेली दिसून आली. याला प्रामुख्याने पाच घटना कारणीभूत असल्याचं म्हटले जात आहे.

Baramati Lok Sabha : पहिली घटना 

सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरु झाल्यानंतर महायुतीचे नेते देखील प्रचारात उतरले. चंद्रकांत पाटील यांनी थेट अजित पवारांच्या घरी देखील भेट दिली. एका पत्रकार परिषदेतील चंद्रकांत पाटलांच्या एका वक्तव्यामुळे मात्र अजितदादांच्या प्रचाराला चांगलाच फटका बसला. एका पत्रकार परिषदेमध्ये ‘बारामतीमधून शरद पवारांचं राजकारण संपवायचं आहे’ असं स्टेटमेंट चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचे अनेक परिणाम पुढच्या काळात दिसून आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp