Loksabha Election 2024: ओमराजे आणि राणांचं वैर! ‘ही’ गणितं ‘धाराशिव’मध्ये खेळ बिघडवणार?

निलेश झालटे

Loksabha Election 2024: धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदार संघ आहेत. पण येथील राजकारण हे पूर्णपणे वेगळं आहे. जाणून घ्या त्याचविषयी.

ADVERTISEMENT

धाराशिवमधील लोकसभेचं नेमकं गणित कसं आहे?
धाराशिवमधील लोकसभेचं नेमकं गणित कसं आहे?
social share
google news

Loksabha Election 2024: मुंबई: काही मतदारसंघ असे असतात जिथं वर्ष, महिने, आठवडे, प्रत्येक दिवस जणू निवडणुकीचे आणि राजकारणाचेच असतात. गावातल्या पारापासून ते शहरातल्या चौकापर्यंत राजकारणाचे गॉसिप सतत सुरु असतात. इथले नेतेही असेच भन्नाट असतात, लोकांमध्ये असतात, चर्चेत असतात. असाच एक मतदारसंघ आहे उस्मानाबाद अर्थात आता ज्या जिल्ह्याचं नाव बदललं तो धाराशिव मतदारसंघ.  ग्रामपंचायत इलेक्शन असो किंवा झेडपी, पंचायत समिती, मार्केट कमिटी असो नाहीतर विधानसभा किंवा येऊ घातलेल्या लोकसभा. (loksabha election 2024 omraje nimbalkar and ranajagjitsinha patil  enmity will these maths spoil the game in dharashiv)

सगळ्या इलेक्शनवर इथली लोकं मोक्कार इन्ट्रेस्ट घेऊन असतात, बोलतात आणि अंदाज बांधतात. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात विस्तार असलेला हा लोकसभा मतदारसंघ एक महत्वाचा मतदारसंघ आहे. लोकसभेसाठी कधी काळी काँग्रेसचा गड मानला जाणारा हा मतदारसंघ. मात्र 1999 पासून केवळ एकवेळचा अपवाद वगळता इथं शिवसेनेनं जो कब्जा केलाय तो आजवर कायम आहे. युतीत हा मतदारसंघ सेनेला सुटत असल्यानं भाजपला अजूनतरी हा मतदारसंघ वाट्याला आला नव्हता. त्यामुळं आता भाजपनं इथं जोरात ताकत लावलीय. पक्षांमधील फुटाफुट आणि सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर इथलं गणितही बदललं आहे.  ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार ओम राजेनिंबाळकर यांना निष्ठेचं फळ मिळणार की भाजपसोबत गेलेल्या राणा जगजितसिंह पाटलांच्या रुपानं भाजपला पहिल्यांदा मतदारसंघ मिळणार यासह अनेक गणितं धाराशिव मतदारसंघात गुंतलेली आहेत. हे गणित काय आहे हेच आपण राजकीय, सामाजिक अंगाने आपण जाणून घेणार आहोत. 

धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदार संघ आहेत. यात उस्मानाबाद जिल्ह्यामधील ४  म्हणजे धाराशिव ,परांडा,तुळजापूर ,उमरगा तर  लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत.

धाराशिव पूर्वीचा उस्मानाबाद  महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एक महत्वाचा जिल्हा. हैदराबादचे ७ वे निजाम मीर उस्मान अली खानच्या काळात शहराला उस्मानाबाद हे नाव देण्यात आले होते. मात्र फेब्रुवारी २०२३ मध्ये या शहराचे व जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय  सरकारनं घेतला.  जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढलेला, त्यामुळं हवामान मुख्यत: कोरडंच असल्याचं चित्र.  ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत. उस्मानाबाद जिल्हा शेळ्यांसाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. पाण्याचा प्रॉब्लेम जरी असला तरी शेती हाच इथला मुख्य व्यवसाय. शेतीच्या अनेक समस्या सोबतच बेरोजगारी, उद्योगाचा म्हणावा तसा विस्तार नाही. म्हणावी अशी डेव्हलप न झालेली एमआयडीसी, रोजगार नसल्यानं इथली बरीच मंडळी पुणे, मुंबईला कामानिमित्त स्थलांतरीत झालीय. महामार्गांचं जाळं जिल्ह्यातून जात असूनही म्हणावा असा विकास झालेला नाही, अशी इथल्या लोकांची ओरड आहे. असं असलं तरी लोक प्रत्येक निवडणुकीला गांभीर्यानं घेतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp