नाशिकमधील नियोजीत साहित्यसंमेलनात नवीन वादाला सुरवात, उद्घाटक जावेद अख्तरांच्या नावाला ब्राम्हण महासंघाचा प्रखर विरोध

मुंबई तक

९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच उद्घाटन विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.मात्र […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. नाशिकमधील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच उद्घाटन विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गीतकार जावेद अख्तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.मात्र ब्राह्मण महासंघातर्फे जावेद अख्तर यांच्या नावाला विरोध करण्यात आला आहे.

भगवंत पाठक यांच्या नेतृत्वाखाली साहित्य संमेलनाचे कार्यालयीन प्रमुख दिलीप साळवेकर यांना निवेदन देऊन जावेद अख्तर यांचे नाव वगळण्याची मागणी ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आली आहे.

ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी महासंघाची भूमिका स्पष्ट केली आहे. जावेद अख्तर आणि गुलजार यांचे मराठी नाट्य सृष्टीत काय योगदान आहे? वीर सावरकरांच्या भूमीत अख्तर, कशासाठी?, असे प्रश्न उपस्थित केले आहेत

हे वाचलं का?

    follow whatsapp