कारभारी लयभारी मालिकेत रंगणार राजवीर आणि प्रियांकाचा विवाहसोहळा

मुंबई तक

सध्या मालिकांमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसतायत, असाच एक लग्न सोहोळा ‘कारभारी लयभारी’ मध्ये अनुभवता येणार आहे. राजकारणावर बेतलेली कारभारी लयभारी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे, सूर्यवंशी आणि पाटील ही दोन राजकीय घराणी आणि त्यांच्यात असलेले राजकीय वैर हे सर्वज्ञात आहे.पियू सजून धजून लग्नासाठी तयार होते. तिला घरची आठवण येते. वीरु सुद्धा छान सजलाय. आई ऐवजी काकी सगळीकडे वरमाईच्या थाटात मिरवते. घरासमोरच लग्न लावलं जातंय. पण अंकुशराव काहीतरी गडबड करणार याची धाकधूक सर्वांच्याच मनात आहे म्हणून घराभोवती मुलांनी कडक पहारा ठेवलाय

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सध्या मालिकांमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसतायत, असाच एक लग्न सोहोळा ‘कारभारी लयभारी’ मध्ये अनुभवता येणार आहे. राजकारणावर बेतलेली कारभारी लयभारी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे, सूर्यवंशी आणि पाटील ही दोन राजकीय घराणी आणि त्यांच्यात असलेले राजकीय वैर हे सर्वज्ञात आहे.पियू सजून धजून लग्नासाठी तयार होते. तिला घरची आठवण येते. वीरु सुद्धा छान सजलाय. आई ऐवजी काकी सगळीकडे वरमाईच्या थाटात मिरवते. घरासमोरच लग्न लावलं जातंय. पण अंकुशराव काहीतरी गडबड करणार याची धाकधूक सर्वांच्याच मनात आहे म्हणून घराभोवती मुलांनी कडक पहारा ठेवलाय

हे वाचलं का?

    follow whatsapp