ब्रेकअप तर झालंच पाहिजे ना भाऊ.. IAS सोडून UPSC क्लास चालवणाऱ्याचा अजबच सल्ला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

breakups important dr vikas divyakirti founder of drishti ias
breakups important dr vikas divyakirti founder of drishti ias
social share
google news

Love-Breakup : प्रेमात पडलेल्या माणसाची गोष्टच वेगळी असते. कारण तो पर्यंत प्रेमात (Love affairs) पडलेला असतो त्यावेळी त्याला सगळं मिळतंच असं नाही. कारण जी व्यक्ती त्याला आवडत असते ती त्याला मिळतेच असं नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस त्याच्यासाठी शेवटच्या दिवसासारखा असतो. तो अनेकदा तो अगदी एकद्या प्रेतासारखाही जगत असतो. त्यामुळे त्याच्या हृदयविकाराची (Heart Attack) वेदना इतकी तीव्र होते की तो आतून बाहेरुन बदलून जातो.

ब्रेकअप के बाद

या अशा गोष्टी सांगतात त्या म्हणजे दृष्टी आयएएस कोचिंग (IAS Coaching) देणारे यूपीएससी (UPSC) अभ्यासक्रमाबरोबरच आयुष्याचे धडे देणारे डॉ. विकास दिव्यकीर्तीही (vikas divyakirti) असेच वेगळं धडे देतात. ते म्हणतात की, ब्रेकअपनंतर होणारा बदल हा ज्या त्या माणसासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे लग्नाआधी एक-दोन ब्रेकअप करणं कधीही चांगलं असते असं माझं मत असल्याचे ते म्हणतात. मात्र ते असं का सांगतात तेच त्यांनी पुढं सांगितले आहे.

हे ही वाचा >> Ajit Pawar: ‘मी कुणाचीच…’, अजितदादांनी सोडलं मौन, मीरा बोरवणकरांना प्रत्त्युतर

नाते तुटले तर

मोठा पदाची आणि प्रतिष्ठेची आयएएससारखी नोकरी सोडून आपल्या वाणीने शिक्षण क्षेत्रात ओळख निर्माण करणाऱ्या दिव्यकीर्ती यांनी ब्रेकअपचा काळ खूप महत्वाचा असतो असं ते मानतात. कारण बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडबरोबर जर नाते तुटले तर त्यानंतरचा काळ मात्र त्यांच्यासाठी भावनिक पातळीवर खूप मजबूत असाच असतो.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुखी वैवाहिक आयुष्य

दिव्यकीर्ती सांगतात की, लग्न नेहमी प्रौढ वयाच्या टप्प्यातच झाले पाहिजे. त्याला महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही जर वैवाहिक आयुष्याला सुरुवात करणार असाल आणि त्याआधी ब्रेकअप झाले तर मात्र आपल्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी तुमच्याकडे एक वेगळी समज येते.

हे ही वाचा >> Honey Trap: तरुणांसोबत अश्लील Video कॉल, चपलेचा हार घालून महिलेला फिरवलं गावभर

मजबूत नातं

लग्नानंतर नातं मजबूत करण्यासाठी आयुष्यात एक धडा पुरेसा असला तरी ब्रेकअप झालेच पाहिजे असं काही नाही हेही ते सांगता. मात्र जर तुमच्या पहिल्या प्रेमात असा जोडीदार मिळाला तर मात्र त्याच्याशी संबंध चांगले चालले असतील, तर ते नक्कीच एकमेकांना जीवनसाथी बनवतील असंही त्यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT