Nana Shankarshet: मुंबई घडवणारे ‘नाना’, एका विनम्र समाजसुधारकाचे पुण्यस्मरण

मुंबई तक

नाना शंकरशेट यांचा 31 जुलै 2023 हा 158 वा स्मृतिदिन आहे. याच निमित्ताने जाणून घेऊयात मुंबई शहराला घडवणाऱ्या या द्रष्ट्या समाजसुधारकविषयी.

ADVERTISEMENT

31 July 2023 is the 158th death anniversary of Nana Shankarshet. On this occasion, let us know about this visionary social reformer who shaped the city of Mumbai.
31 July 2023 is the 158th death anniversary of Nana Shankarshet. On this occasion, let us know about this visionary social reformer who shaped the city of Mumbai.
social share
google news

चंद्रशेखर बुरांडे (आर्किटेक्ट), मुंबई: आद्य मुंबईच्या (Mumbai) राजकीय, सामाजिक, धार्मिक इत्यादि क्षेत्रात थोर व्यक्तींनी केलेल्या स्फूर्तिदायक कार्यातून प्रेरणा मिळावी म्हणून त्या व्यक्तीचे पुतळारूपी स्मारक उभारण्याची परंपरा आहे. स्मारके आपल्या जीवनातील भूतकाळ व भविष्यातील दुवा साधण्याचे तसेच पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शकाचे काम करतात. ब्रिटिशकालीन बहुभाषिक मुंबईच्या जडणघडणीत अनेक व्यक्तींचे योगदान लाभले आहे. म्हणून मुंबई शहर इतर शहरांपेक्षा आगळेवेगळे आहे. गतकालीन मुंबई निर्मितीचे श्रेय तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर्स, आर्किटेक्टस व समाजाची बौद्धिक जडणघडण व त्यांच्या समस्येची पूर्तता करण्यासाठी झगडणार्‍या भारतीय समाजसुधारकांना जाते. प्रशासकीय अनुभव असलेल्या गव्हर्नर सर बार्टल फ्रियरने शहर आराखडे बनवून त्याची अंमलबजावणी केली. (nana shankarshet visionary social reformer who shaped the city of mumbai 31 July 2023 is the 158th death anniversary)

आर्किटेक्ट फ्रेड्रिक स्टीव्हन्स, जॉर्ज विटेट, जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट, इत्यादिनी जगप्रसिद्ध सरकारी इमारती डिजाइन केल्या. मुंबईतील अनेक पंथ व धर्मातील धनिक उद्योजकांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून सामाजिक कार्यासाठी लागणार्‍या उत्तमोत्तम इमारती उभारण्यात आल्या. ह्या कार्यात जमशेदजी जीजीभाय, प्रेमचंद रायचंद, जेहांगीर कावसजी, फ्रामजी कावसजी इत्यादी उद्योजकांचा समावेश होता. समाजबांधणीत द्रष्टे व ज्वलंत राष्ट्रप्रेम असलेल्या अनेक समाजधुरिणांनी पुढाकार घेतला. जेव्हा आपण स्वातंत्र्यपूर्व मुंबईतील समाजसुधारकांचे कार्य व त्यांच्या कर्तुत्वाची दखल घेतो तेव्हा प्रामुख्याने नाना शंकरशेट यांचे नाव पुढे येते.

यांच्या प्रभावळीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर, डॉ. भाई दाजी यांच्यासारखी जनतेच्या कल्याणसाठी झटणारी थोर मनाची अनेक बुद्धिवान महाराष्ट्रीय माणसे होती. परंतु विविध सामाजिक कार्यात एकाच व्यक्तीने पुढाकार घेणार्‍या व्यक्ती संख्येने फार कमी असतात. नाना शंकरशेट हे त्यापैकी एक होते. मुंबईतील उद्योजक व राज्यकर्त्यांशी नानांचे अत्यंत स्नेहपूर्ण व सलोख्याचे संबंध होते. जमशेदजी जीजीभाय आणि फ्रामजी कावसजी हे नानांपेक्षा वयाने मोठे होते तरी देखील त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. नानांच्या पुण्यस्मरणदिनी त्यांचे स्नेही फ्रामजी कावसजी यांचे स्मारक उभारण्यामागे त्यांचा पुढाकार कसा होता हे जाणून घेवूया.

फ्रामजी कावसजी हे आपल्या आयुष्यभर ज्या ध्येयसिद्धीसाठी झटले व झगडले त्याला सर्वस्वी पोषक होवून राहणारे असेच शैक्षणिक स्वरूपाचे स्मारक होते. फ्रामजी कावसजी यांचे 1851 मध्ये निधन झाले. त्यांचे स्मारक करण्यासंबंधीचा पहिला ठराव मांडण्याचा बहुमान नानांच्या वाट्यास आला व ती घटना अगदी स्वाभाविक होती. आझाद मैदानानजीक धोबीतलावावरील जागेत इमारतीचा पायाभरणीसमारंभ स्मारक समितीचे अध्यक्ष नाना शंकरशेट यांच्या हस्ते तारीख 22 फेब्रुवारी 1862 रोजी पार पडला. या प्रसंगी नानांनी केलेल्या भाषणाचा मथितार्थ थोडक्यास असा होता:

हे वाचलं का?

    follow whatsapp