‘BJPचे 80-85 जण म्हणालेले बंड करायचं का?’, अजित पवारांनी टाकला राजकीय बॉम्ब
Ajit Pawar Vidhansabha: मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Govt) खडेबोल सुनावले. सरकारने स्वतःची पाठ थोपटवून घेऊ नये, राज्यपालांनी मराठी भाषण करायला हवं होतं, असंही अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी एक खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री पद न […]
ADVERTISEMENT

Ajit Pawar Vidhansabha: मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनातील राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Govt) खडेबोल सुनावले. सरकारने स्वतःची पाठ थोपटवून घेऊ नये, राज्यपालांनी मराठी भाषण करायला हवं होतं, असंही अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांनी एक खळबळजनक दावा केला आहे. देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री पद न मिळाल्याने भाजपचे (BJP) 80 ते 85 आमदार बंडखोरीच्या तयारीत होते. असं अजित पवार यावेळी म्हणाले. (ajit pawars strong speech in legislative assembly bjp 80 to 85 mlas were going to revolt ajit pawar claims)
विधानसभेत अजित पवारांची तुफान फटकेबाजी
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाकडे देशाचं लक्ष आहे. सरकारची स्थापना कशी झाली? पक्षांतर बंदीबद्दल सुप्रीम कोर्ट आठ दिवसांत निकाल देणार असल्याची बातमी कानावर आली. वादग्रस्त मुद्दे घटनापीठाकडे गेलेले आहेत. अशा परिस्थितीत राज्यपालांवर मोठी घटनात्मक जबाबदारी येऊन पडलेली आहे.
लोकशाही राहणार की, काय होणार, याकडे देश बघतोय. उद्या निर्णय झाल्यानंतर त्याचे पडसाद देशपातळीवर आणि वेगळ्या राज्यात कशापद्धतीने उमटतात. सरकारपेक्षा विरोधकांकडे आपलं लक्ष राहावं अशी आमची अपेक्षा आहे, अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली.
अतुल भातखळकर आणि संजय कुटे यांचं भाषण फार बारकाईने ऐकत होतो. त्यांचं तर कामच आहे की, ते सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचं काम केलंच पाहिजे. पण, आपण सगळे राजकीय पक्षात काम करत असताना काय पद्धतीने बघतो की, आपलं सरकार चांगलं चाललंय की नाही? हे आपण आपल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो.