मराठी माणूस नाही, शिवसेना हरलीये; संजय राऊतांना भातखळकरांचा टोला

मुंबई तक

सगळ्याचं लक्ष असलेल्या बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला. या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली. महापालिका निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्याला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं. बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. संजय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

सगळ्याचं लक्ष असलेल्या बेळगाव महापालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला. या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली. महापालिका निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्याला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं.

बेळगाव महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून उत्तल दिलं.

अतुल भातखळकर काय म्हणाले?

‘मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही, अशा शब्दात बेळगावच्या भाजपच्या विजयावर संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे. बेळगावात मराठी माणूस हरला नसून, शिवसेना हरली आहे. भाजपचे किमान १५ मराठी उमेदवार जिंकले आहेत. ही फशिवसेना असल्याचं मराठी माणसाच्या लक्षात आले आहे’, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp