भाई जगताप-झिशान सिद्दीकीमध्ये पुन्हा संघर्ष; नाना पटोलेंकडून मध्यस्थी

मुंबई तक

काँग्रेसचे भाई जगताप आणि झिशान सिद्दीकी यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झिशान सिद्दीकी विरूद्ध भाई जगताप असा वाद पाहण्यास मिळतो आहे. बांद्रा पश्चिम भागातले काँग्रेस नेते झिशान सिद्दिकींनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात तक्रा करणारं एक पत्र सोनिया गांधी यांना लिहिलं आहे. 14 नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या एका […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

काँग्रेसचे भाई जगताप आणि झिशान सिद्दीकी यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झिशान सिद्दीकी विरूद्ध भाई जगताप असा वाद पाहण्यास मिळतो आहे.

बांद्रा पश्चिम भागातले काँग्रेस नेते झिशान सिद्दिकींनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात तक्रा करणारं एक पत्र सोनिया गांधी यांना लिहिलं आहे. 14 नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या एका रॅलीत या दोघांच्यात झालेल्या गोंधळासंदर्भाने हे पत्र लिहिलेलं आहे. आता या दोघांची समजूत घालण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मध्यस्थी केली आहे.

सोनिय गांधी यांना लिहिलेल्या पत्रात झिशान सिद्दीकी म्हणतात..

मॅडम, मी अत्यंत धक्कादायक आणि अविश्वसनिय परिस्थितीत हे पत्र लिहितो आहे. काल के.सी. वेणुगोपाल आणि एच के. पाटील यांनी एक मोर्चा आयोजित केला होता. मोर्चाच्या आधी अनेक नेत्यांना राजगृहात जायचं होतं. त्यासाठीची यादीही भाई जगताप यांना देण्यात आली होती. त्या यादीत माझं नाव नव्हतं त्यामुळे मला जाऊ दिलं गेलं नाही. त्यानंतर मला शिवीगाळ करून बाहेर काढण्यात आलं एवढंच नाही तर तुला काय करायचं ते तू कर असंही सांगण्यात आलं. त्यामुळे मी हे पत्र लिहित आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp