उद्धवजी राणे, राज ठाकरेंना शिवसेनेतून का बाहेर जावं लागलं?, फडणवीसांचा तिखट सवाल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘उद्धव ठाकरे जर तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर नारायण राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं?, राज ठाक रेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं?’ असा थेट सवाल विचारत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.

‘मी फक्त बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळण्यासाठी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.’ असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसरा मेळाव्यातील भाषणात म्हटलं होतं. ज्याबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी थेट असं म्हटलं आहे की, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा होती आणि म्हणूनच शिवसेनेते नारायण राणे, राज ठाकरे यांना बाहेर जावं लागलं.

‘उद्धवजी.. राणे, राज ठाकरेंना पक्षातून का जावं लागलं?’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की, उद्धवजी.. समजा तुम्हाला दिलेला शब्दच पूर्ण करायचा होता तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं. दिवाकर रावते होते, सुभाष देसाई होते, एकनाथ शिंदे होते.’

‘खरं म्हणजे इतिहासात आपण डोकवल्यानंतर लक्षात येतं की, जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तर राणेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? राणेंना काय पक्षप्रमुख व्हायचं नव्हतं. राज ठाकरेंना पक्षातून का बाहेर जावं लागलं? त्यामुळे ठीक आहे.. तुमची महत्त्वाकांक्षा होती, तुम्ही पूर्ण केली. पण त्या करता आता आम्हाला दोष देणं थांबवा.’ अशा शब्दात टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा होती असं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

‘बेईमानीने सत्तेत आलात, मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती.. तुम्ही पूर्ण केली’, फडणवीसांचा CM ठाकरेंवर हल्लाबोल

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

बाळासाहेबांना दिलेला शब्द अजूनही पूर्ण झालेला नाही!

‘मी हे पद स्वीकारलं ते एका जबाबदारीने स्वीकारलं… ते फक्त माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून. मी हे पद स्वीकारलं. शिवसेनाप्रमुखाला दिलेलं वचन म्हणून.. तसं पाहिलं तर अजून ते वचन पूर्ण झालेलं नाही. मी त्यांना सांगितलंय की, तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करुन दाखवेन आणि तो मी दाखवेनच. ही जबाबदारी मी मोठ्या विचाराने घेतलेली आहे.’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

‘…तर मी राजकीय जीवनातून बाजूला सुद्धा झालो असतो’

‘कदाचित जर दिलेलं वचन त्यांनी पाळलं असतं आणि शिवसैनिक मुख्यमंत्री केला असता तर मी कदाचित हा शब्द वापरतोय. मी या राजकीय जीवनातून बाजूला सुद्धा झालो असतो. कारण हे क्षेत्र माझं नाही. की, ही टीका माझ्यावर होते… हो हे क्षेत्र माझं नाही. मी एक पुत्र कर्तव्य निभावण्यासाठी या क्षेत्रात आली आणि पाय रोवून ठामपणाने उभा राहिलेलो आहे. ही जबाबदारी खांद्यावर आहे ती ठामपणे पार पाडल्याशिवाय मी राहणार नाही.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT