आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप, शाळेच्या अध्यक्षांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या शाळेच्या अध्यक्षांचा अटकपूर्व जामीन आज मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. कोल्हापूर येथील एका आंतरराष्ट्रीय शाळेचे अध्यक्ष असलेल्या गणपतराव पाटील यांच्यावर मुलाच्या आजोबांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पाटील यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.

मुलाच्या आजोबांनी कोल्हापूर येथील शिरोळी MIDC पोलीस स्टेशनमध्ये अध्यक्ष पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आपल्या तक्रारीत मुलाच्या आजोबांनी, संचालकांनी आपल्या नातवाला बोलावून घेत आपल्यासमोर त्याला ओरडत त्याचा अपमान होईल असे शब्द वापरले. तुझा काहीही उपयोग नाही, तू झोपडपट्टीतल्या मुलांसारखा वागतोय, तुझ्यासारख्या मुलांना जगायचा अधिकारी नाही, तू पृथ्वीवर भार आहेस असे शब्द वापरत आपल्या मुलाला सर्वांसमोर ओरडलं. ज्यानंतर आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचं मुलाच्या आजोबांनी सांगितलं.

जाणून घ्या काय घडलं होतं तेव्हा?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आरोपी अध्यक्ष गणपतराव पाटील यांची पत्नी याच शाळेत मुख्याध्यापिका आहे. १ एप्रिलला शाळेतून मुलाच्या आजोबांना बोलावून घेण्यात आलं. आजोबा शाळेत पोहचल्यावर त्यांनी आपल्या नातवाकडे चौकशी केली असता, फुटबॉल खेळत असताना त्याने मारलेल्या किकमुळे गोलपोस्ट पडून एका मुलीला जखम झाली. ज्यानंतर मुलाने सांगितल्याप्रमाणे पाटील यांनी त्याला अश्लील शब्दांत ओरडून अपमानित केलं. ज्यानंतर आजोबा नातवाला घेऊन पाटील यांच्या भेटीसाठी गेले असता त्यांनी पुन्हा एकदा आजोबांसमोरच नातवाला कठोर शब्दांत चार गोष्टी सुनावल्या.

हायकोर्टात अध्यक्ष पाटील यांची बाजू वकील ऋषिकेश मुंदरगी आणि प्रवदा राऊत यांनी मांडली. “गणपतराव पाटील हे शाळेचे अध्यक्ष आहेत. शिस्त लावण्यासाठी त्यांनी केलेल्या कृतीमुळे एखाद्या विद्यार्थ्याने अशा प्रकारचं पाऊल उचलावं असा त्यांचा नक्कीच हेतू नव्हता. ठोस पुरावे असल्याशिवाय पाटील यांचं कृत्य IPC 107 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कक्षेत येत नाही”, अशी बाजू मांडली.

ADVERTISEMENT

दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकल्यानंतर जस्टीस विनय जोशी यांच्या खंडपीठाने, या प्रकरणाचा आढावा घेतला असता, पाटील यांच्या विद्यार्थ्यांशी वागण्यासंदर्भात अनेक पालकांच्या तक्रारी आल्याचं कळतंय. त्यामुळे परिस्थितीजन्य पुराव्यानुसार, पाटील यांचं वागणं आक्षेपार्ह होतं हे म्हणायला वाव आहे. ते मुलांना ओरडू नक्कीच शकतात परंतू अशा पद्धतीने नाही की त्यांच्या मनावर परिणाम होईल असं मत व्यक्त केलं.

ADVERTISEMENT

गणपतराव पाटील यांनी मुलाला अयोग्य पद्धतीने वागणूक दिली. त्यांनी मुलाच्या पालकांना शाळेत बोलावलं, त्यांच्यासमोर आणि शिक्षकांसमोर आक्षेपार्ह शब्दांचा वापर करुन त्याला पुन्हा ओरडलं. पाटील यांच्या या वागण्यामुळे मुलाच्या मनात नैराश्य तयार झालं असं दिसून येतंय. त्यांच्या या ओरडण्यानंतर मुलाने काही तासातच आत्महत्या केल्यामुळे पाटील यांच्या वागण्याचा या घटनेशी थेट संबंध असल्याचं कळतंय. मुलाला सतत ओरडणं, त्याचा अपमान करणं, शिवीगाळ करणं यामुळे त्याच्या मनात निराशा निर्माण झाली. शाळेत हा प्रकार घडल्यानंतर मुलाने काही तासात आपलं जीवन संपवलं. आरोपीने असं वातावरण निर्माण केलं ज्यामुळे मुलाला आपलं आयुष्य संपवाव वाटलं असं म्हणत जस्टीस जोशी यांनी पाटील यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT