विधानसभा अध्यक्षांची निवड योग्य वेळेत होईल! मुख्यमंत्र्यांचं राज्यपाल कोश्यारींना पत्राद्वारे उत्तर
राज्याचं पावसाळी अधिवेशन जवळ येऊन ठेपलेलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे यंदाचं अधिवेशन हे फक्त दोन दिवसांचं होणार आहे. यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना निवेदन दिलं होतं. ज्यावरुन कोश्यारींनी फडणवीसांनी केलेल्या तिन्ही मागण्या महत्वाच्या असल्याचं म्हणत कार्यवाही करण्यात यावी […]
ADVERTISEMENT

राज्याचं पावसाळी अधिवेशन जवळ येऊन ठेपलेलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे यंदाचं अधिवेशन हे फक्त दोन दिवसांचं होणार आहे. यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना निवेदन दिलं होतं. ज्यावरुन कोश्यारींनी फडणवीसांनी केलेल्या तिन्ही मागण्या महत्वाच्या असल्याचं म्हणत कार्यवाही करण्यात यावी असे आदेश दिले होते.
काय होत्या देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या मागण्या –
१) विधानसभेचं अधिवेशन अधिक कालावधीसाठी घेण्याबाबत
२) विधानसभा अध्यक्षांचं संविधानिक पद तातडीने भरण्याबाबत