निर्णय झाला! महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून होणार सुरू; ‘या’ नियमांचं करावं लागणार पालन

मुंबई तक

राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर विद्यापीठे आणि महाविद्यालये कधी सुरू होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. यावेळी सामंत यांनी महाविद्यालयांसाठीची मार्गदर्शन नियमावलीही जाहीर केली. महाविद्यालये सुरू करतासाठीची नियमावली आम्ही तयार केली आहे. सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर विद्यापीठे आणि महाविद्यालये कधी सुरू होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली. यावेळी सामंत यांनी महाविद्यालयांसाठीची मार्गदर्शन नियमावलीही जाहीर केली.

महाविद्यालये सुरू करतासाठीची नियमावली आम्ही तयार केली आहे. सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांना ती पाठवण्यात येणार आहे. त्यानुसारच 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेनं महाविद्यालय सुरु करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाशी चर्चा करुन निर्णय घ्यायचा आहे. हा अधिकार आम्ही विद्यापीठांना दिला आहे, असं सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

‘वसतीगृहं टप्प्याटप्प्याने सुरु करण्याबाबत संचालक उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण यांनी आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच मुंबई महानगर क्षेत्रामध्ये वाहतुकीचे मुख्य साधन लोकल ट्रेन असल्याने विद्यार्थ्यांना प्रवासाची परवानगी मिळणे आवश्यक असल्याने याबाबतचा प्रस्ताव मुख्य सचिवांकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

काय आहे नियमावली? कोणत्या विद्यार्थ्यांना मिळवणार प्रवेश?

हे वाचलं का?

    follow whatsapp