मध्यरात्री लाईट गुल, पोलिस कारवाईच्या शंकेने शेतकऱ्यांचं जागरण

मुंबई तक

नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बुधवारी रात्री उशिरा गाजीपूर बॉर्डरवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलन करत असलेल्या भागातली लाईट कट केल्याचा आरोप पोलिसांवर केलाय. शेतकऱ्यांनी पोलिस आणि सरकारवर आंदोलनात अस्थैर्य निर्माण करण्याचा आरोप केला. दरम्यान, लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 37 शेतकरी नेत्यांविरुद्ध […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बुधवारी रात्री उशिरा गाजीपूर बॉर्डरवर गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलन करत असलेल्या भागातली लाईट कट केल्याचा आरोप पोलिसांवर केलाय. शेतकऱ्यांनी पोलिस आणि सरकारवर आंदोलनात अस्थैर्य निर्माण करण्याचा आरोप केला.

दरम्यान, लाल किल्ला हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 37 शेतकरी नेत्यांविरुद्ध २२ एफआयआर नोंदवलेत. हिंसाचाराच्या घटनेनंतर दोन शेतकरी संघटनांनीही या आंदोलनातून काढता पाय घेतलाय.

शेतकरी नेते राकेश टिकैत मीडियाशी बोलताना म्हणाले, ‘प्रशासनानं आज वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलाय. लाईट कट करण्यात आली. भीतीचं वातावरण तयार केलं जातंय. त्यामुळे आम्ही रात्र जागून काढण्याचा निर्णय घेतलाय. आमचं आंदोलन संपावं, असं प्रशासनाला वाटतंय.’

हे वाचलं का?

    follow whatsapp