ठाकरे सरकारचा ओबीसी आरक्षण अध्यादेश राज्यपालांनी पाठवला परत; मागितली माहिती - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / ठाकरे सरकारचा ओबीसी आरक्षण अध्यादेश राज्यपालांनी पाठवला परत; मागितली माहिती
बातम्या

ठाकरे सरकारचा ओबीसी आरक्षण अध्यादेश राज्यपालांनी पाठवला परत; मागितली माहिती

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये आणखी एका मुद्द्यावरुन वाद रंगण्याची चिन्ह आहेत. ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणावरुन काढलेला अध्यादेश राज्यपाल कोश्यारी यांनी परत पाठवल्याचं कळतंय. विधानपरिषदेच्या १२ जागांच्या नियुक्तीला राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यापाठोपाठ ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशालाही राज्यपालांनी ब्रेक लावत ठाकरे सरकारला काही महत्वाचे प्रश्न विचारले आहेत.

सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असताना अध्यादेश कसा काढला असा प्रश्न राज्यपाल कोश्यारी यांनी सरकारला विचारल्याचं कळतंय. राज्यपालांनी हा अध्यादेश परत पाठवल्यानंतर राज्य सरकारही कायदेशीर सल्ला घेऊन राज्यपाल कोश्यारींना उत्तर देणार असल्याचं कळतंय. महिलांवरील अत्याचाराविरुद्ध विशेष अधिवेशन बोलवण्याच्या राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंनी उत्तर दिल्यानंतर हा नवीन वाद समोर आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 5 जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद पोटनिवडणूक जाहीर केली आहे. 5 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं 15 सप्टेंबरला महत्वाचा निर्णय घेतला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली होती.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात अशा प्रकारचा एक अध्यादेश काढण्यात आला होता. त्यानुसार ओबीसी आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली होती. 15 सप्टेंबरला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचंही भुजबळ यांनी यावेळी सांगितलं होतं.

जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती जागांसाठी होतंय मतदान?

धुळे – 15
नंदूरबार – 11
अकोला – 14
वाशिम -14
नागपूर -16

जाणून घ्या किती पंचायत समित्यांमध्ये होणार मतदान?

धुळे -30
नंदूरबार -14
अकोला -28
वाशिम -27
नागपूर -31

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 3 =

वेब सीरीजमधील ‘तो’ गायक ‘जो’ बनला निर्दयी खुनी! IPS पत्नीसोबत IAS पतीची परदेशवारी… दिसतायेत दोघंही लय भारी! Gufi paintal : महाभारतात शकुनी मामा लंगडत का चालायचे? Aditi Rao Hydari घटस्फोटनंतर दुसऱ्या अभिनेत्याच्या प्रेमात! थाटणार संसार? Anil Ambani यांची फिल्मी लव्हस्टोरी! जेव्हा कुटुंबाच्या विरोधात गेले तेव्हा… Reham Khan : इम्रान खान यांच्या EX पत्नीचं तिसरं लग्न, पतीसोबत रोमँटिक अंदाज! तुम्हाला ‘या’ सवयी असतील, तर मुलांवर होईल वाईट परिणाम; वेळीच सावध व्हा! फिटनेस फ्रीक Shilpa Shetty मुलांसोबत मस्ती करताना थकली! यूजर्स म्हणाले.. मालदीवमध्ये Rinku Singh चा स्टायलिश लुक! 6 पॅक अ‍ॅब्सवर सर्वांच्या खिळल्या नजरा! Balasore Train Accident : विरेंद्र सेहवाग ‘त्या’ मुलांचा होणार पालक, केली मोठी घोषणा IPL मधून माहीची बक्कळ कमाई; एका सामन्याची फी जाणून व्हाल हैराण! कतरीना कैफची ‘ही’ सवय आवडत नाही, विक्की कौशलचा खुलासा WTC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा झटका, स्टार गोलंदाज बाहेर रेल्वे रूळांमध्ये किंचीत अंतर सोडण्यामागचे कारण काय? बॉक्सऑफिसवर सारा-विकीची हटके जोडी, दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ! Train accidents : ‘या’ अपघातांनी अवघा भारत हादरला होता, तुम्हाला किती माहितीये? एका Video Call मुळे व्यक्तीला 5 कोटींचा गंडा! चुकूनही ‘हे’ नका करू Mukesh Ambani यांची गोंडस नात!.. घेतलं कुशीत; क्यूट Photos Viral तुमचं मूलही मोबाईल असल्याशिवाय जेवत नाही? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार.. Adah Sharma : ‘नाकाची सर्जरी करून घे’, जेव्हा अभिनेत्रीला दिला होता सल्ला; म्हणाली..