नाशिकमध्ये संचारबंदीची घोषणा, ‘या’ वेळेत बाहेर पडता येणार नाही!

मुंबई तक

नाशिक: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता नाशिक जिल्ह्यात उद्यापासून (22 फेब्रुवारी) संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. यामधून फक्त आपात्कालीन सेवांशी संबिधत असणाऱ्यांनाच सूट मिळणार आहे. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज (21 फेब्रुवारी) दिली. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. तसेच मास्क न वापरणाऱ्यांना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नाशिक: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता नाशिक जिल्ह्यात उद्यापासून (22 फेब्रुवारी) संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. यामधून फक्त आपात्कालीन सेवांशी संबिधत असणाऱ्यांनाच सूट मिळणार आहे. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज (21 फेब्रुवारी) दिली. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

तसेच मास्क न वापरणाऱ्यांना तब्बल 1000 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश देखील छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

ही देखील बातमी पाहा: अमरावतीत उद्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊन, पालकमंत्र्यांची घोषणा

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत घोषणा केली की 22 फेब्रुवारी नाशिक मध्ये रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी लागू राहील. कोरोना विषयक नियम उल्लंघन केल्याm थेट गुन्हा नोंदविण्याचे आदेशही पोलिसांना देण्यात आलेले आहेत. नाशिक शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस व महापालिका ह्यांनी संयुक्त कारवाई करावी तसेच 1000 रु दंड ठोठावण्यात यावा असे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp