शरद पवारांच्या नावे सुरू होणार आरोग्य योजना; धनंजय मुंडेंनी केली घोषणा

मुंबई तक

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून लवकरच नवीन आरोग्य योजना आणली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे ही योजना राज्यात लागू केली जाणार असून, याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून लवकरच नवीन आरोग्य योजना आणली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे ही योजना राज्यात लागू केली जाणार असून, याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी प्रस्तावित असलेल्या आरोग्य योजनेची घोषणा केली.

साठीनंतर ज्येष्ठ नागरिकांना अनेक आजार बळवतात. या आजारांचं निदान करण्यासाठी तपासण्या कराव्या लागतात. या चाचण्या खर्चिक असतात. त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च येतो. अनेकांना आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णालयात जाणंही शक्य होत नाही. या सगळ्या बाबींचा विचार करून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद पवार यांच्या नावे आरोग्य योजना आणण्याचं प्रस्तावित आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

शरद शतमः असं योजनेचं नाव असेल, असंही धनंजय मुंडे म्हणाले. याचा लाभ राज्यातील हजारो वयोवृद्ध नागरिकांना होईल. ही योजना सध्या प्रस्तावित असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असं धनंजय मुंडे म्हणाले.

वयोवृद्ध नागरिकांसाठी असणारी ही योजना ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे. या योजनेतंर्गत वयोवृद्ध नागरिकांच्या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. मात्र, या मोफत चाचण्या वर्षातून एकदाच करता येणार आहेत.

बदलत्या जीवनशैलीचा जेष्ठ नागरिकांच्या राहणीमानावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्य व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थितीलाही त्यांना तोंड द्यावं लागत आहे. आवश्यक त्यावेळी आरोग्य चाचण्या न करता आल्याने ज्येष्ठ नागरिकांचे विविध आजार शेवटच्या टप्प्यात लक्षात येतात, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

चाचण्या न केल्यामुळे उशिराने निदान झाल्याने उपचार करण्यास विलंब होण्याचा तसेच रुग्ण दगावण्याचाही धोका असतो. या सर्व बाबींचा विचार करुन, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा कवच योजना सुरु करण्याचा निर्णय याअगोदर घेण्यात आला. त्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीये.

हे वाचलं का?

    follow whatsapp