महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजारांहून जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, मृत्यू दर 2.4 टक्के

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजार 978 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत राज्यात एकूण 59 लाख 38 हजार 734 कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.21 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 7 हजार 243 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज दिवसभरात 196 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.4 टक्के झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 43 लाख 83 हजार 113 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 72 हजार 645 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 74 हजार 463 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4 हजार 607 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 4 हजार 406 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 7 हजार 243 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 61 लाख 72 हजार 645 झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण 196 मृत्यूंपैकी 167 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 29 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

10 हजारांपेक्षा जास्त रूग्ण असलेले जिल्हे

मुंबई – 10 हजार 611

ADVERTISEMENT

ठाणे- 16 हजार 100

ADVERTISEMENT

पुणे – 16 हजार 663

सांगली- 10 हजार 951

कोल्हापूर – 10 हजार 782

महाराष्ट्रातल्या सांगली, कोल्हापूर, पुणे, ठाणे आणि मुंबई अशा पाचही जिल्ह्यांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT