IRCTC New Rule: तिकीट बुकिंगचे नियम बदलले; व्हेरिफिकेशन सक्तीचं, तारीख बदलता येणार

मुंबई तक

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रेल्वेतून प्रवास करण्याचा संबंधच आला नसेल. त्यामुळे त्यांना रेल्वे तिकीट बुक करताना काही नवीन गोष्टी कराव्या लागतील. कारण इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC ने तिकीट बुकिंगच्या नियमात अनेक बदल केले आहेत. या बदलांमुळे काही गोष्टी करणं आवश्यक झालं आहे. पण, महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वेच्या बुक केल्या तिकीटात प्रवासासंबंधी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचा रेल्वेतून प्रवास करण्याचा संबंधच आला नसेल. त्यामुळे त्यांना रेल्वे तिकीट बुक करताना काही नवीन गोष्टी कराव्या लागतील. कारण इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC ने तिकीट बुकिंगच्या नियमात अनेक बदल केले आहेत. या बदलांमुळे काही गोष्टी करणं आवश्यक झालं आहे. पण, महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेल्वेच्या बुक केल्या तिकीटात प्रवासासंबंधी बदलही करता येणार आहेत. तर जाणून घेऊया काय आहेत नवीन नियम…

रेल्वे तिकीट बुक करताना ‘या’ गोष्टींचं व्हेरिफिकेशन महत्त्वाचं

रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी लॉग करावं लागतं. यासाठी आता स्वतः नोंदणीकृत मोबाईल नंबर व ईमेल आयडी आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टींची पडताळणी (व्हेरिफिकेशन) झाल्यानंतरच तिकीट बुक करता येणार आहे. IRCTC च्या पेजवर गेल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठी नवीन पेज ओपन होईल. तिथे OTP च्या माध्यमातून तुमचा मोबाईल व ईमेल आयडी व्हेरिफिकेशन केलं जाईल.

तिकीट कॅन्सल न करता प्रवासाची तारीख बदलता येणार

हे वाचलं का?

    follow whatsapp