Pune: महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत आक्षेपार्ह लिखाण करणारा ‘लखोबा लोखंडे’ सापडला!

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांबद्दल सोशल मीडियावर बदनामीकारक लिखाण करणार्‍या अभिजीत लिमये नावाच्या तरुणाला पुणे पोलीसांच्या सायबर सेलने मुंबईतून अटक केली. लखोबा लोखंडे या फेसबुक पेजवरून तो सतत आक्षेापार्ह लिखाण करत असल्याचं समोर आल्याने त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. मात्र, यावेळी अभिजीत लिमयेविरुद्ध निषेध व्यक्त करत शिवसैनिकांनी थेट त्याला काळं फासल्याची घटना घडली आहे.

लखोबा लोखंडे या पेजवरुन आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या अभिजीत लिमये याला मुंबईतून अटक करण्यात आली. पण याप्रकरणी त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाने अभिजीत लिमयेला जामीन मंजूर केला. त्यामुळे अभिजीत लिमयेची तात्काळ सुटका झाली. मात्र, न्यायालयातून बाहेर पडल्यावर निषेध म्हणून शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी अभिजीत लिमयेच्या तोंडाला काळं फासलं.

सोशल मीडियावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर याच प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर सेलने अभिजीत लिमये याला अटक केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, कोर्टाकडून जामीन मिळाल्याने अभिजीतची सुटका झाली मात्र, याचवेळी काही कार्यकर्त्यांनी अभिजीत लिमयेच्या तोंडाला काळं फासून आपण यापुढे असं करणार नाही असं वदवून देखील घेतलं.

सोशल मीडियावर मागील काही वर्षांपासून राजकीय नेत्यांबाबत आक्षेपार्ह लिखाण हे सातत्याने वाढत असल्याचं दिसून येत आहेत. ज्यामुळे अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या संपूर्ण प्रकाराला आळा घालण्यासाठी आता सरकारला काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.

ADVERTISEMENT

‘राणेंच्या दोन्ही मुलांना मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’, मंत्र्यासमोरच वादग्रस्त वक्तव्य

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर व्यक्त होण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिक हा व्यक्त होऊ शकतो. मात्र, त्यावेळी आपला विवेक शाबूत राखून व्यक्त होणं हे देखील गरजेचं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार या संपूर्ण प्रकरणात नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, अभिजीत लिमये याला याप्रकरणी जामीन मंजूर झालेला असला तरीही आता तो या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलिसांच्या रडारवर आला आहे. त्यामुळे यापुढे अशाप्रकारचं कोणतंही लिखाण करणं हे त्याला महागात पडू शकतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT