वसई विरार महापालिका 2015 च्या निवडणुकीत बहुजन आघाडीचा डंका, इतिहास घ्या जाणून

मुंबई तक

Vasai-Virar Muncipal Corporation history : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार या महापालिकेचा इतिहास आणि अंतिम निकालाबाबतची एकूण माहिती ही पुढीलप्रमाणे नमूद करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

vasai-virar muncipal corporation history
vasai-virar muncipal corporation history
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वसई-विरार महानगरपालिका थोडक्यात इतिहास

point

वसई-विरार महानगरपालिका अंतिम निवडणूक निकाल 2015 

Vasai-Virar Muncipal Corporation history : राज्यात महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. तसेच अनेक पक्षांच्या उमेदवारीच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. या निवडणुकीची तारीख देखील जाहीर झाली आहे. 15 जानेवारी रोजी मतदानाचा दिवस असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. याच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार या महापालिकेचा इतिहास आणि अंतिम निकालाबाबतची एकूण माहिती ही पुढीलप्रमाणे नमूद करण्यात येत आहे.

हे ही वाचा : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

वसई-विरार महानगरपालिका थोडक्यात इतिहास

वसई-विरार महानगरपालिका ही वसई, विरार, नालासोपारा आणि नवघर-माणिकपूर या चार नगरपरिषदांच्या एकत्रीकरणातून आणि 53 ग्रामपंचायतींच्या समावेशातून निर्माण झाली. या महापालिकेची स्थापना ही 3 जुलै 2009 रोजी झाली होती. महानगरपालिकेने शहराच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या आहेत, ज्यात परिवहन सेवा पाणीपुरवठा, स्वच्छता आणि शिक्षण यांचा समावेश आहे. ही महापालिका MMR अंतर्गत क्षेत्रात येते. यामुळे या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होतो.

वसई-विरार महानगरपालिका अंतिम निवडणूक निकाल 2015 

वसई-विरार महानगरपालिका अंतिम निवडणूक ही 2015 मध्ये झाली होती. या निवडणुकीत बहुजन आघाडीने प्रचंड यश मिळवलं होतं. त्यांनी एकूण 115 पैकी 106 जागांवर विजयी मिळवला होता. शिवसेनेने 5 जागा, काँग्रेसने 1 जागा, भाजपने 1 जागा. राष्ट्रवादीला खाते देखील खोलता आलं नाही आणि अपक्षांनी 2 जागा जिंकल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

या बागात जनगणनेनुसार लोकसंख्या ही सुमारे 12.22 लाख होती. आज याच ठिकाणी सुमारे आज अंदाजे 23 लाखांहून अधिक नागरिक राहतात. वसई-विरार महानगरपालिकेचा भाग 311 चौ. कि.मी. क्षेत्रात व्यापलेला आहे. तसेच हा भाग मुंबई मेट्रोपोलिटन भागाचा, महत्वाचा भाग हा आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp