महाराष्ट्रातील ‘गांधीजींचं गाव’ : काय आहे गांधीजींच्या गावाची संकल्पना?

मुंबई तक

–रोहित वाळके देश स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये अनेकांनी आपला सहभाग नोंदवला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वातंत्र्याची विचारधारा जोपासणारी अनेक माहिती नसलेल्या गोष्टी दृष्टीआड होत आहेत. स्वातंत्र्य संग्रामाच्या अगोदरपासूनच गांधीजींच्या विचारांचे वारे या गावात वाहत होते म्हणूनच आजही या गावाला ‘गांधीजींचे गाव’ म्हटले जातं. या गावाचं नाव आहे कोंभळी! अहमदनगर-सोलापूर महामार्गावर घोगरगाव आहे. इथून […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

रोहित वाळके

देश स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये अनेकांनी आपला सहभाग नोंदवला. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वातंत्र्याची विचारधारा जोपासणारी अनेक माहिती नसलेल्या गोष्टी दृष्टीआड होत आहेत. स्वातंत्र्य संग्रामाच्या अगोदरपासूनच गांधीजींच्या विचारांचे वारे या गावात वाहत होते म्हणूनच आजही या गावाला ‘गांधीजींचे गाव’ म्हटले जातं. या गावाचं नाव आहे कोंभळी!

अहमदनगर-सोलापूर महामार्गावर घोगरगाव आहे. इथून अर्धा किमी अंतरावर कोंभळी फाटा आहे. उजव्या बाजूला दिसणाऱ्या या फाट्यापासून दहा किमी अंतरावर पुढं गेल्यावर कोंभळी गाव सुरु होतं. रस्ता तसा चांगला झालेला त्यामुळे नगरपासून साधारणतः तासाभरात इथे पोहचता येतं.

काय आहे गांधीजींच्या गावाची संकल्पना?

हे वाचलं का?