उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते! प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा चर्चेत आणल्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. औरंगाबाद येथील सभेत बोलत असताना राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर 4 तारखेपासून मी कोणाचंही ऐकणार नाही असा इशारा देत राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना मशिदीसमोर हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर लावण्याचे आदेश दिले. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने राज ठाकरे […]
ADVERTISEMENT
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा चर्चेत आणल्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. औरंगाबाद येथील सभेत बोलत असताना राज ठाकरेंनी 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर 4 तारखेपासून मी कोणाचंही ऐकणार नाही असा इशारा देत राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना मशिदीसमोर हनुमान चालीसा लाऊडस्पीकरवर लावण्याचे आदेश दिले.
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने राज ठाकरे यांना आपल्या सोशल मीडियावर भोंग्याच्या अल्टीमेटमची आठवण करुन देत उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते असं म्हटलं आहे.
डाव्या डोळ्यावर बट…हिरव्या पैठणीत प्रार्थनाचा मनमोहक अंदाज पाहिलात का?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
प्राजक्ता माळीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्राजक्ताने अक्षय्य तृतीया आणि ईद च्या शुभेच्छा देताना एक पोस्ट लिहीली होती. ज्यात राज यांच्या औरंगाबाद येथील भाषणाचं कौतुक करत प्राजक्ताने, उद्यापासून गोंगाट बंद होईल अशी आशा बाळगते. हल्ली अशाप्रकारे समाजाला शहाणं करण्यासाठी कोण झटतं? खूप धन्यवाद असं लिहीलं. पाहा प्राजक्ताची मुळ पोस्ट…
ADVERTISEMENT
परंतू यानंतर तीने आपल्या मुळ पोस्टमध्ये बदल करत ही पोस्ट फक्त शुभेच्छांपूरती मर्यादीत ठेवून गोंगाट कमी होईल अशी आशा व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
याआधीही प्राजक्ता माळीने गुढीपाडव्याला राज ठाकरेंच्या सभेला हजेरी लावली होती. ज्याचा व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता.
दरम्यान, राज ठाकरे यांनी ईदपर्यंत मशिदींवरील भोंगे न उतरल्यास हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईत राज्याचे गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेतली.
‘मिशन राज/प्लान आर’ : मनसे नेत्यांना दिलेल्या नोटीसमध्ये पोलिसांनी काय दिलाय इशारा?
यावेळी रजनीश सेठ यांनी म्हटले की, ‘राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. समाजकंटक आणि गुन्हेगारी स्वरुपाच्या लोकांवर मोठ्याप्रमाणावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. समाजातील एकोपा टिकवण्यासाठी स्थानिक स्तरावर बैठका घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावर आता राज ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.’
Shiv Sena vs MNS: ‘देशातील एकमेव भाडोत्री पक्ष म्हणजे मनसे’, शिवसेना नेत्याची घणाघाती टीका
ADVERTISEMENT