Sakinaka Rape Case “मेणबत्ती मोर्चे आणि ट्विटर ट्रेंड नको, आता…” मनसे संतापली

मुंबई तक

साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेनं मुंबईचा थरकाप उडाला. आरोपींने केलेल्या क्रूर अत्याचारांनी पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. इतर राजकीय पक्षांबरोबर मनसेनंही संताप व्यक्त करत ‘आणखी किती निर्भया?’ असा सवाल उपस्थित केला आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर नराधमाने बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीनं पीडितेच्या गुप्तांगात रॉडही घातला. या प्रकारामुळे दिल्लीत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

साकीनाका येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेनं मुंबईचा थरकाप उडाला. आरोपींने केलेल्या क्रूर अत्याचारांनी पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. इतर राजकीय पक्षांबरोबर मनसेनंही संताप व्यक्त करत ‘आणखी किती निर्भया?’ असा सवाल उपस्थित केला आहे.

मुंबईतील साकीनाका परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर नराधमाने बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीनं पीडितेच्या गुप्तांगात रॉडही घातला. या प्रकारामुळे दिल्लीत झालेल्या निर्भया घटनेच्या स्मृती जाग्या झाल्या.

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पीडितेला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तत्काळ शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण पाशवी अत्याचारांमुळे पीडितेचा उपचारादरम्यानं मृत्यू झाला. या घटनेनं मुंबई सुन्न झाली. तर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होऊ लागला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. आणखी किती निर्भया? असं म्हणत मनसेनं नराधमांना फासावर लटकावण्याची मागणी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp