Mumbai : ‘आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी…’; राणा विरुद्ध शिवसेना संघर्षावर कोण काय म्हणालं?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांनी मातोश्री बाहेर हनुमान पठणाचा इशारा दिल्यानंतर मुंबईत बरंच राजकीय गोंधळ उडाला. राणा दाम्पत्याचं घरं असलेल्या भागात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं.

याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत असून, शिवसेना नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडली. तर भाजपने शिवसेनेवर निशाणा साधला. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने राणा दाम्पत्यावर टीका केली आहे.

मुंबईत हनुमान चालीसा पठणावरून सुरू असलेल्या गोंधळावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत हल्ला चढवला. “आता बास झालं. (Enough is Enough!) आता संयम आणि सौजन्याची ऐशी तैशी… जय महाराष्ट्र!!,” असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नागपुरात माध्यमांशी बोलताना राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. “बायकांच्या पाठीमागून वार करणं बंद करा. सात जन्म घ्यावी लागतील भाजपला आम्हाला पुरुन उरायला… केरळ, पश्चिम बंगालमध्ये भाजपला तिथले लोकं पुरुन उरले होते… कायदा आणि सुव्यवस्था बिघण्याचं काम भाजपचीच लोकं करत आहेत..त्यामुळे हा सगळा प्रकार बंद करा,” असं राऊत म्हणाले.

शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही या गोंधळावरून एक ट्विट केलं आहे.

ADVERTISEMENT

“कुठे शोधिसी रामेश्वर अन्

ADVERTISEMENT

कुठे शोधिसी काशी..

ह्रुदयातील भगवंत राहिला

ह्रुदयातून उपाशी।

#हनुमान_चालीसा #राजकारण,”

असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनीही ट्विट केलं असून, “मानलं बुवा… एका महिलेने अवघ्या पक्षाला रस्त्यावर आणले,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. “भाजपचे कठपुतळी महाराष्ट्रामध्ये जोमाने कामाला लागले आहेत. कोणी भोंग्याच्या नावाने धार्मिक राजकारण करत आहे आणि काही लोक धार्मिक पाठ वाचण्याचे नाटक रचत आहेत. हे कठपुतळीचे नाटक रचून भाजपला काही यश मिळणार नाही,” असं त्यांनी म्हटलं आहे.

“तुमच्या घरासमोर हनुमान चालीसा नको म्हणून तुमचा विरोध आहे. हजारो लोक रस्त्यावर जमवलीत काही हरकत नाही. आम्हाला पण आमच्या घरासमोर भोंगा नकोय. आम्ही काय चुकीचं बोलतोय? न्याय सगळ्यांना सारखाच हवा. बरोबर ना मुख्यमंत्री साहेब???,” असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी उपस्थित केला आहे.

“दिपा बारच्या मालकासोबत ज्यांची उठबस त्यांना चालिसा आठवतेय. हे चालीसा वाले नाही, चाळीस पैसे वाले आहेत. यांची राम आणि हनुमान यांचं नाव घ्यायची लायकी नाही,” अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. “राणा दाम्पत्याने कुणाची तरी सुपारी घेतली असावी. गेले २-३ दिवस विनाकारण हा मेलोड्रामा सुरू आहे. पुढे काय करायचं पोलिसांना माहिती आहे. विनाकारण शिवसैनिकांचा राग ओढवून घेऊ नका,” असं गृहमंत्री म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT