नवाब मलिकांना समीर वानखेडेंविरोधात आरोप करणं भोवलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना ईडीने अटक केली. पण मलिक हे काही आता अटकेचा विषय किंवा नॅशनल हेडलाईन बनलेले नाहीयेत. 2021 मधली आर्यन खानची केस तुम्हाला लक्षात असेलच, त्यावेळेला समीर वानखेडे आणि NCB ला शिंगावर घेणारं कुणी असेल तर ते नवाब मलिकच. नवाब मलिकांना अटक झाल्यानंतर असं बोललं जातंय की NCB, समीर वानखेडेंना टार्गेट करणं मलिकांना महागात पडलंय का?

2021 मध्ये असं नेमकं काय घडलेलं? मलिकांनी NCB आणि समीर वानखेडेंवर नेमके काय आरोप केलेले? जाणून घेऊयात सविस्तर.

2 ऑक्टोबर- कॉर्डिलिया क्रूझवर NCB ने रेड टाकली, ज्यात पहिले शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आलं, आणि नंतर आर्यन NCB च्या कस्टडीत गेला, काही दिवसांनंतर आर्थर रोड जेलमध्येही गेला, जिथे तो 20 दिवस होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आधी फक्त बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शनपुरता मर्यादित असलेल्या या प्रकरणात उडी मारली ती मंत्री नवाब मलिकांनी. आर्यनला रेड झाल्याच्या 4 दिवसांतच म्हणजे 6 ऑक्टोबरला नवाब मलिकांनी एक पत्रकार परिषद घेतली, तेव्हापासून ही रेड कशी एक फर्जिवाडा होती ते समीर वानखेडे हा अधिकारीच कसा फ्रॉड आहे इथपर्यंत मलिकांनी शेकडो आरोप केले, हे आरोप काय होते ते पण सजमून घ्या.

आर्यन खानला NCB कार्यालयात नेताना दोन व्यक्ती दिसल्या, एक केपी गोसावी आणि दुसरी मनिष भानुशाली, जे पंच विटनेससुद्धा होते. यात गोसावीवर आधीचे फसवणुकीचे गुन्हे दाखल होते तर मनीष भानुषाली भाजपचा पदाधिकारी होता. त्यामुळे हे दोघे NCB च्या कारवाईत कसे इथपासूनच मलिकांनी या ड्रग केसवर शंका उपस्थित करायला सुरूवात केली होती.

ADVERTISEMENT

पुढे जाऊन 9 ऑक्टोबरला नवाब मलिक यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आणखी एक गंभीर आरोप केला. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, आर्यन खानसोबतच रिषभ सचदेवा यालाही क्रूझवरुन अटक करण्यात आली होती. रिषभ सचदेवा हा भाजपच्या युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचा मेहुणा आहे. रिषभला अटक केल्यानंतर भाजपची सूत्र हलली आणि या तिघांना सोडून देण्यात आलं.

ADVERTISEMENT

आर्यन खान प्रकरणात भाजप कशा प्रकारे सक्रीय आहे हे दाखवून देण्याचा कुठेतरी नवाब मलिक यांचा प्रयत्न होता.

पुढे जाऊन समीर वानखेडे हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. NCB केवळ ठराविक साक्षीदारांद्वारे बनावट छापे मारते. असंही मलिक म्हणाले होते.

24 ऑक्टोबरला याच केसमधला पंच विटनेस प्रभाकर साईलने ‘मुंबई Tak’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं की समीर वानखेडेंनी कोऱ्या कागदांवर पंच विटनेसच्या सह्या घेतल्या, आणि आर्यन खानला सोडवण्यासाठी खंडणी वसूल करण्याचीही डिमांड केलेली, ज्याबाबत शाहरूखची मॅनेजर पूजा ददलानीशी बोलणंही सुरू होतं.

इथून आर्यन खान प्रकरणाचा फोकस हा पूर्णपणे समीर वानखेडे, त्यांची कार्यपद्धती आणि वैयक्तीत आयुष्य आणि भाजप कनेक्शनवरही मलिकांनी वळवला होता.

आर्यन खानप्रकरणी NCB आणि समीर वानखेडेंना टार्गेट करता-करता मलिकांनी एक नाव घेतलं जयदीप राणा. हा माणूस ड्रग पेडलर आहे, याला एनसीबीने जून 2021 मध्ये अटक केली होती, याचं भाजपसोबत नेमकं कनेक्शन काय?’ असा सवाल राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांनी अमृता फडणवीसांसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करुन विचारला होता. याच ट्विटचा हवाला देत नवाब मलिक यांनी देखील याबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

‘देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहिमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत.’ असं म्हणत मलिक यांनी जयदीप राणा आणि देवेंद्र फडणवीस यांचा देखील एक फोटो शेअर केला होता.

पुढचं नाव…नीरज गुंडे. नीरज गुंडे ही व्यक्ती देवेंद्र फडणवीसांच्या जवळची असून ड्रग केसनंतर ही व्यक्ती ईडी कार्यालायत जाते, समीर वानखेडेंनाही भेटते, यामागे कारणं काय असं मलिकांनी विचारलं होतं.

वानखेडेंवर मलिकांनी काही वैयक्तिक आरोपही केले होते.

वानखेडेंनी आपण मुस्लिम असल्याचं लपवत नोकरीत आरक्षण लाटल्याचा आरोपही मलिकांनी केला. दुसरीकडे त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव आहे की दाऊद यावरूनही आरोप झाले होते.

नवाब मलिकांनी ट्विटरवर काही फोटोही शेअर केले. ज्यात वानखेडे यांच्या पहिल्या लग्नातला फोटो, हे लग्न मुस्लिम पद्धतीने झालंय, हे दाखवण्यासाठी निकाहनामा सुद्धा मलिकांनी ट्विटरवरून शेअर केला होता.

क्रोनोलॉजी समझिये… पाहा आर्यन खानसाठी पुढे सरसावलेले नवाब मलिक कसे सापडले ईडीच्या जाळ्यात!

याच्यापुढे समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत, त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव नसून दाऊद आहे, हे दाखवण्यासाठी समीर वानखेडेंचा जन्मदाखलाही मलिकांनी ट्विटरवर शेअर केला होता.

यापुढे जाऊन नवी मुंबईतील सद्गुरू बारचा लायसन्स वानखेडेंना अल्पवयीन म्हणजेच 17 व्या वर्षी कसा काय मिळाला, असाही प्रश्न मलिकांनी उपस्थित केला होता.

ह्या सगळ्या आरोपांनंतर 5 नोव्हेंबर 2021 ला समीर वानखेडेंकडून आर्यन खानप्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला, 31 डिसेंबर 2021 मध्ये त्यांचा NCB मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्याने extension न देता, DRI-directorate of Revenue Intelligence मध्ये बदली करण्यात आली.

याशिवाय मलिक आणि पंच विटनेसेसच्या आरोपांनंतर खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांची टीम, SC जात खोटी दाखवल्याप्रकरणी नॅशनल शेड्युल कास्ट कमिशन, बार लायसन्सप्रकरणी ठाणे कोपरी पोलिस स्टेशन, आणि वडिलांच्या नावावरून बदनामीची केस मुंबई हायकोर्टात अशाप्रकारे तपास सुरू झाला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT