समीर वानखेडेंच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टात याचिका, सेवेतून बरखास्त करण्याची मागणी

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला दिलेल्या जामिनाची प्रत समोर आल्यानंतर एनसीबीला मोठा झटका बसला आहे. कारण आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित कोणताही कट रचत नव्हता. त्याच्या व्हॉट्स अॅप चॅटमधूनही काहीही समोर आलेलं नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. एवढंच नाही तर समीर वानखेडेंवरही आरोपांमागून आरोप होत आहेत. मुंबईतल्या सद्गुरू बारची मालकी समीर वानखेडे यांची आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तर दुसरीकडे आजच नवाब मलिक यांच्या मुलींनी समीर वानखेडेंची लग्न पत्रिका समोर आणली आहे. त्यामध्ये समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख केल्याचं ट्विट या दोघींनी केलं आहे.

अशात आता समीर वानखेडे यांच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत समीर वानखेडेंना एनसीबीच्या विभागीय संचालक पदावरून बरखास्त करावं अशी मागणी करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी IRS मधे दाखल होऊनही आपल्या जातीचा आणि धर्माचा खुलासा केला नाही त्यामुळे समीर वानखेडेंना त्यांच्या पदावरून बरखास्त करण्यात यावं अशी मागणी करणारी ही याचिका आहे. समाजसेवक महादेव कांबळे आणि वकील नितीन सातपुते यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

समीर वानखेडे आणि रेस्तराँ-बार कनेक्शन?; नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट

समीर वानखेडे यांनी मुस्लिम असल्याचं लपवून सरकारी नोकरी मिळवली. त्यांनी हे सांगितलं की हे प्रकरण आता चौकशी समिती बघते आहे. कांबळे यांनी याचिकेत असं म्हटलं आहे की 1993 मध्ये समीर वानखेडेंच्या वडिलांनी त्यांचं नाव दाऊद ऐवजी ज्ञानदेव ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र वानखेडे यांच्या धर्मात काही बदल झाला नाही. याचिकेत हा दावाही करण्यात आला आहे की एससी कोट्यातून कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हे सगळं करण्यात आलं होतं. समीर वानखेडे यांनी आपल्या जातीबद्दल आणि धर्माबद्दल चुकीची माहिती देऊन सरकारी नोकरी मिळवली आहे त्यामुळे त्यांना पदावरून बरखास्त करण्यात यावं.

ADVERTISEMENT

आर्यन खान प्रकरणात कारवाई केल्यापासून समीर वानखेडेंवर हे आरोप करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सर्वात आधी हे आरोप केले. त्यानंतर आरोपांची मालिकाच त्यांच्याविरोधात मलिक यांनी सादर केली.

ADVERTISEMENT

काय आहेत नवाब मलिक यांनी केलेले आरोप?

आर्यन खानचं अपहरण करून शाहरुख खानकडून मोठी खंडणी उकळण्याचा समीर वानखेडे यांचा डाव होता. त्यामुळेच कॉर्डिलिया क्रूझवर कारवाई करण्याचा बनाव रचला गेला.

आर्यन खानवर केलेली कारवाई भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यानुसार होती. यातल्या इतर लोकांना भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून सोडून देण्यात आलं.

समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत त्यांच्या वडिलांनी मुस्लिम स्त्रीसोबत विवाह करण्यासाठी धर्म परिवर्तन केलं, त्यानंतर ते परत हिंदू धर्मात परतले.

समीर दाऊद वानखेडे असंच नाव समीर यांच्या जन्मदाखल्यावर आहे.

समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असूनही त्यांनी आपण एससी असल्याचे दाखवत आणि सगळ्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून सरकारी नोकरी मिळवली.

खंडणी गोळा करण्यासाठीच समीर वानखेडे हे विविध बॉलिवूड स्टार्स आणि हिंदी सिनेसृष्टीतल्या कलाकारांना धमकावत असतात.

समीर वानखेडे 70 हजारांचे टीशर्ट, 1 लाखाचे बूट वापरतात. सरकारी अधिकाऱ्याकडे इतका पैसा कुठून येतो?

हे मुख्य आरोप नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर केले आहेत. आता समाजसेवक महादेव कांबळे यांनीही हायकोर्टात याचिका दाखल करून समीर वानखेडेंना सेवेतून बरखास्त करावं असं म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT