महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना शरद पवारांचा टोला, म्हणाले…

मुंबई तक

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा आणि सगळा कारभार केंद्राकडे द्या असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्या वक्तव्याचा शरद पवार यांनी आज खरपूस समाचार घेतला आहे. साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज येथील लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला श्रीनिवास पाटील, चेअरमन अनिल पाटील, रयत कौन्सिलचे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा आणि सगळा कारभार केंद्राकडे द्या असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्या वक्तव्याचा शरद पवार यांनी आज खरपूस समाचार घेतला आहे.

साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज येथील लोकनेते रामशेठ ठाकूर भवनाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला श्रीनिवास पाटील, चेअरमन अनिल पाटील, रयत कौन्सिलचे रामशेठ ठाकूर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत शरद पवारांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा देत त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

….मग राष्ट्रपती राजवट स्वीकारून कारभार केंद्राकडे द्या -चंद्रकांत पाटील

राज्यातील विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थिर आहे. या सरकारला क्लिअरकट मेजॉरिटी आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी स्थिर सरकार देण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. म्हणूनच ते अशी विधानं करत आहेत. अशी विधाने याआधीही केली गेली होती. त्याचा काही परिणाम झाला नाही. अशा पद्धतीच्या विधानांना नागरिक गांभीर्याने घेत नाहीत, असा टोलाही पवारांनी लगावला.

हे वाचलं का?

    follow whatsapp