'ज्याला मूलं-बाळ होतं नाही, त्याला अशोक खरातने सांगताच झालं', मिरगावातील ग्रामस्थ काय म्हणाला? VIDEO
Ashok Kharat Viral Video Nashik : नाशकातील भोंदूबाबा अशोक खरात याच्याबद्दल मिरगावातील ग्रामस्थ काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात... अशोक खरात गावातील लोकांना प्राधान्य देत नव्हता, असंही गावकऱ्याने सांगितलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'ज्याला मूलं-बाळ होतं नाही, त्याला अशोक खरातने सांगितलेल्या मार्गाने लगेच झालं',
मिरगावातील ग्रामस्थ काय म्हणाला?
Ashok Kharat Viral Video Nashik : "बाबाकडे (अशोक खरात) गेल्यानंतर तो परफेक्ट सांगतो. तो सांगतो ते होतच, असे आमच्याकडे दोन-तीन किस्से घडले होते. ज्याला मूलं-बाळ होत नाही, त्याला सांगितल्यानंतर मूलं-बाळ झालं. असे किस्से परिसरात ऐकले आहेत. त्या माणसाबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला होता. बाहेरचे अनेक लोकं त्यांच्याकडे येत होते. बाबांनी असं करायला नको होतं. परिसरात त्यांचं खूप मोठं नाव होतं. आता गावाचं नाव बदनाम झालंय", अशी माहिती मिरगावमधील एका ग्रामस्थाने दिली. तो मुंबई Tak शी बोलत होते. गावात अशोक खरातबद्दल काय बोललं जायचं? याबाबतही त्याने सविस्तर माहिती दिली.
हेही वाचा : दारू पिण्यावरून नवरा-बायकोमध्ये वाद, पतीने पत्नीला बेदम मारहाण करत ठार मारलं
'आम्हाला त्याच्या कृत्याची माहिती असती तर आमचेही संबंध वाईटच असते'
ग्रामस्थ अशोक खरातबद्दल बोलताना म्हणाला, "आमचा साहेबांशी (अशोक खरात) 9-10 वर्षांपासून परिचय आहे. आम्ही मूळचे इथलेच आहोत. त्यामुळे जाणं-येणं अगदी जवळून आहे. येथील शंकराचं मंदिर हे गावाची शानच आहे. मंदिरासाठी लोकांचा विरोध राहणार नाही. हे प्रकरण उघड झाल्यानंतर लोकांचा त्यांना विरोध असेल. मीडियासमोर हे प्रकरण समोर आलं. आम्हाला याची माहिती असती तर आमचे आणि त्यांचे संबंध वाईटच असते"
हेही वाचा : अशोक खरातचा आणखी एक किळसवाणा व्हिडीओ, मुलीला टीशर्ट वर करायला सांगितला अन् पोटावर... VIDEO










