पंतप्रधान मोदींच्या रस्त्यात आले शेतकरी, सभा करावी लागली रद्द; पंजाबमध्ये नेमकं काय घडलं?
पंजाबच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐनवेळी कार्यक्रम रद्द करावा लागला. पंतप्रधानांची फिरोजपूर येथे रॅली होणार होती. मात्र, दौऱ्यात अडथळा निर्माण झाल्यानं पंतप्रधान 15 ते 20 मिनिटं उड्डाणपूलावरच अडकले. अचानक झालेल्या या घटनेप्रकरणी केंद्री गृहमंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केलं असून, पंतप्रधानांच्या दौऱ्याबद्दल झालेल्या हलगर्जीपणाबद्दल गंभीर दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हुसैनीवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा […]
ADVERTISEMENT

पंजाबच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऐनवेळी कार्यक्रम रद्द करावा लागला. पंतप्रधानांची फिरोजपूर येथे रॅली होणार होती. मात्र, दौऱ्यात अडथळा निर्माण झाल्यानं पंतप्रधान 15 ते 20 मिनिटं उड्डाणपूलावरच अडकले. अचानक झालेल्या या घटनेप्रकरणी केंद्री गृहमंत्रालयाने निवेदन प्रसिद्ध केलं असून, पंतप्रधानांच्या दौऱ्याबद्दल झालेल्या हलगर्जीपणाबद्दल गंभीर दखल घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हुसैनीवाला येथील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाला भेट देणार होते. त्यानंतर फिरोजपूर येथे पंतप्रधान कार्यक्रमाला हजेरी लावणार होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव कार्यक्रम रद्द करण्यात करण्यात आला.
केंद्रीय गृह मंत्रालयाने निवदेन प्रसिद्ध केलं असून, त्यात सुरक्षेतील कारणांचा उल्लेख करण्यात आला आहे. निवेदनात म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी बठिंडा पोहोचले. त्यानंतर तेथून पंतप्रधान हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येतील राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जाणार होते. मात्र, पाऊस आणि दृश्यमानता कमी (poor visibility) असल्याने पंतप्रधानांना 20 मिनिटं प्रतिक्षा करावी लागली, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.