पुणे : विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेनं खळबळ; कारण आलं समोर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तुम्ही मुंबई मेरी जान सिनेमा बघितलाय का? बघितला असेल, तर त्यातील अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे मॉलमध्ये बॉम्ब असल्याचं सांगून उडालेल्या धावपळीचा प्रसंग तुम्हाला आठवत असेल. असंच काहीसं घडलं आहे पुण्यातील लोहगाव विमानतळावर! विमानात बॉम्ब असल्याच्या अफवेनं एकच धावपळ उडाली. ही अफवा पसरवली ती आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीनं.

तर झालं असं की, पुणे लोहगाव विमानतळ 16 ते 30 ऑक्टोबर दरम्यान धावपट्टीच्या कामानिमित्त विमान सेवा बंद राहणार आहे. मात्र काल शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता हृषिकेश सावंत त्याच्या पत्नीला पुणे विमानतळावर सोडण्यास गेला होता. त्याची पत्नी रांचीला जात होती.

सकाळी 8:50 वाजता जाणाऱ्या एअर एशियाच्या पुणे-रांची विमानाने त्या जाणार होत्या. त्याचवेळी ते 16 तारखेचं परतीचं तिकीट कन्फर्म करीत होते. मात्र तेथील विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तिकिट होणार नसल्याचं कारण सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यावेळी हृषिकेश याचं तेथील कर्मचाऱ्यांसोबत भांडण झालं. भांडणादरम्यानच विमानामध्ये बॉम्ब असल्याचं हृषिकेश यानं सांगितलं. त्यावर सर्व यंत्रणेची एकच धावपळ उडाली.

त्यानंतर ते विमान बाजूला घेऊन तब्बल तीन तास तपासणी करण्यात आली. तपासणी केली असता त्यामध्ये काहीच आढळून आलं नाही. अखेर ती अफवा असल्याचं स्पष्ट झालं. मात्र, या अफवेमुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं.

ADVERTISEMENT

8:50 वाजता उड्डाण करणार विमान अफवेमुळे दुपारी 12 वाजता रवाना झालं. अफवा पसरवल्याच्या प्रकरणी हृषिकेश सावंत याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

सावंत याची चौकशी सुरू असल्याचं विमानतळ पोलिसांकडून सांगण्यात आलं. सावंत याच्या या अफवेनं मात्र, प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT