लोकशाहीची हत्या, भारतात चार लोकांची हुकुमशाही; राहुल गांधींचा मोदी सरकारवर प्रहार
वाढती महागाई, बेरोजगारी आणि अग्निपथ योजना या मुद्द्यांवरून काँग्रेसने मोदी सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. राजधानी दिल्लीसह देशभर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वाढत्या महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “लोकशाहीची जी हत्या होत आहे, त्याविषयी […]
ADVERTISEMENT

वाढती महागाई, बेरोजगारी आणि अग्निपथ योजना या मुद्द्यांवरून काँग्रेसने मोदी सरकारविरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. राजधानी दिल्लीसह देशभर काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वाढत्या महागाई, बेरोजगारीच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “लोकशाहीची जी हत्या होत आहे, त्याविषयी काय वाटत आहे. देशाने ७० वर्षात लोकशाही बनवली, ती ८ वर्षात मिटली. आज देशात लोकशाही राहिलेली नाही. आज भारतात चार लोकांची हुकुमशाही आहे. आम्ही महगाई, बेरोजगारीचे मुद्द्यांवर आवाज उठवू इच्छितो, पण आम्हाला संसदेत बोलू दिलं जात नाही,’ असं राहुल गांधी म्हणाले.
“लोकशाहीची हत्या होत असल्याचं भारत बघत आहे. आपल्या सर्वांसमोर हे होतंय. जो कुणी या हुकुमशाहीविरोधात उभं राहू पाहतोय. त्याला अटक केली जातेय. त्याला मारलं जात आहे. महागाई, मुद्दे उपस्थित केले जाऊ दिले जात नाहीयेत,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
विरोधकांच्या मागे ईडीच्या चौकशा लावल्या जाताहेत; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
“विरोधी पक्ष देशातील स्वायत्त संस्थांच्या बळावर विरोधक लढत असतात. पण या सर्वच संस्थावर आज सरकारने आपले लोक बसवून ठेवले आहेत. प्रत्येक संस्थांमध्ये आरएसएसची माणसं आहेत. जेव्हा आमचं सरकार होतं. तेव्हा आम्ही ते नियंत्रित करत नव्हतो. त्यामुळे आज जर कुणी दुसऱ्या पक्षाला समर्थन देत असेल, तर त्याच्याविरोधात ईडी, इतर चौकशा लावल्या जातात, त्यामुळे विरोधक उभे राहत आहेत. पण हवा तितका प्रभाव टाकू शकत नाहीये,” अशी टीका राहुल गांधींनी केली.